शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडूनही मच्छिमारांचा विश्वासघात : परशुराम उपरकर

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही.

कणकवली : मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत कोणी कोणाला पळवून लावले व कोणाला जवळ केले, हे मच्छिमारांना ठाऊक आहे. गेल्या पंधरा वर्षांत माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी मच्छिमारांना झुलवत ठेवले. तर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनीही मच्छिमारांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शिवसेना-भाजपातील अंतर्गत वादात मच्छिमारांचा प्रश्न चिघळला असल्याचेही उपरकर म्हणाले. आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. गेल्या महिन्यात समुद्रातील मच्छिमारांच्या उपोषणावेळी नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांना सिंधुदुर्गात आणणार असल्याचे सांगितले होते. हे आश्वासन फोल ठरले आहे. वर्षभर हा मच्छिमारांचा प्रश्न जवळून पाहणाऱ्या आमदार नाईक यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल उपरकर यांनी केला.पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही. हिंसक आंदोलने होऊनही पालकमंत्री मच्छिमारांची भेट घेण्यासाठीही आले नाहीत. त्यांचे आणि आमदार नाईक यांचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ल्यात बहुतांश पर्ससीननेट मच्छिमार आहेत. पालकमंत्र्यांना पालकत्वाचे महत्त्वच नाही. उपरकर म्हणाले की, आमदार नाईक यांनी मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यापेक्षा अभ्यास करून अधिवेशनात हा प्रश्न मांडावा. हा प्रश्न सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने याप्रश्नी वकील देऊन शासनाची भूमिका मांडण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला मालवणवासीयांनी निवडून दिलेले नसतानाही आम्ही सातत्याने मच्छिमारांचा प्रश्न अभ्यासपूर्ण मांडला. मात्र, आमदार नाईक यात का कमी पडत आहेत. आम्ही या प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे परशुराम उपरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)