शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडूनही मच्छिमारांचा विश्वासघात : परशुराम उपरकर

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही.

कणकवली : मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत कोणी कोणाला पळवून लावले व कोणाला जवळ केले, हे मच्छिमारांना ठाऊक आहे. गेल्या पंधरा वर्षांत माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी मच्छिमारांना झुलवत ठेवले. तर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनीही मच्छिमारांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शिवसेना-भाजपातील अंतर्गत वादात मच्छिमारांचा प्रश्न चिघळला असल्याचेही उपरकर म्हणाले. आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. गेल्या महिन्यात समुद्रातील मच्छिमारांच्या उपोषणावेळी नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांना सिंधुदुर्गात आणणार असल्याचे सांगितले होते. हे आश्वासन फोल ठरले आहे. वर्षभर हा मच्छिमारांचा प्रश्न जवळून पाहणाऱ्या आमदार नाईक यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल उपरकर यांनी केला.पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही. हिंसक आंदोलने होऊनही पालकमंत्री मच्छिमारांची भेट घेण्यासाठीही आले नाहीत. त्यांचे आणि आमदार नाईक यांचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ल्यात बहुतांश पर्ससीननेट मच्छिमार आहेत. पालकमंत्र्यांना पालकत्वाचे महत्त्वच नाही. उपरकर म्हणाले की, आमदार नाईक यांनी मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यापेक्षा अभ्यास करून अधिवेशनात हा प्रश्न मांडावा. हा प्रश्न सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने याप्रश्नी वकील देऊन शासनाची भूमिका मांडण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला मालवणवासीयांनी निवडून दिलेले नसतानाही आम्ही सातत्याने मच्छिमारांचा प्रश्न अभ्यासपूर्ण मांडला. मात्र, आमदार नाईक यात का कमी पडत आहेत. आम्ही या प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे परशुराम उपरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)