शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

कडवईत श्रेयवादावरून फलकबाजी

By admin | Updated: March 29, 2016 00:23 IST

संगमेश्वर तालुका : रेल्वे स्थानकाच्या मंजुरीवरून जुगलबंदी; प्रस्ताव केंद्राकडे रवाना

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वे स्थानकाच्या मंजुरीवरून आता श्रेयवाद सुरू झाला आहे. या श्रेयवादातूनच याठिकाणी लावण्यात आलेला फलक चर्चेचा विषय बनला आहे. कोकण रेल्वे कडवई रेल्वेस्थानक संघर्ष समितीने लावलेल्या या फलकामुळे संघर्ष समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, या रेल्वेस्थानकाच्या बांधकामाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिले आहे. या स्थानकासाठी मनसेनेच प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.रेल्वेस्थानकाच्या मागणीसाठी २००८ सालापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी अनेक आंदोलने छेडली. कडवई स्थानक बांधकामाचा प्रस्तावही केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, हे होत असताना श्रेयाची लढाई मात्र तीव्र होताना दिसत आहे. कडवई स्थानकासाठी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहेत. वर्षभरापूर्वी याच आंदोलनातून स्थानकाला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने प्रत्यक्ष बांधकामाला विलंब होत आहे. यासाठी नुकताच १५ जानेवारी रोजी ग्रामस्थांच्यावतीने रेलरोकोचा प्रयत्नही करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासनाच्यावतीने सहाय्यक प्रबंधक टी. मंजुनाथ व संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांनी ग्रामस्थांसोबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी करण्यात आलेल्या रेलरोको आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, सदानंद ब्रीद, राजवाडी सरपंच नंदकुमार मांजरेकर यांच्यासह सर्वपक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होेते. रेल्वेस्थानक निर्मितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ८ आॅक्टोबर २०१५ला पाठवण्यात आला असून, कडवईसह कोकण रेल्वे मार्गावरील १० रेल्वेस्थानके व ८ लुपलाईनच्या बांधकाम मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे लेखी पत्र रेल्वे प्र्रशासनाने दिले आहे. मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना अनिल घोसाळकर नामक व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक संघर्ष समिती स्थापन झाली असून, कडवई स्थानकाच्या मागणीसाठी ही समिती प्रयत्न करणार असल्याचे फलक चार दिवसांपूर्वी कडवई परिसरात अनधिकृतरित्या लावण्यात आले आहेत. त्यावर मनसेने आक्षेप घेतल्याने प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जे लोक गेल्या ८ वर्षात झालेल्या एकाही आंदोलनात सहभागी नव्हते आणि त्यांनी अचानक असे फलक झळकावले असल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. हा फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. (वार्ताहर)श्रेय लाटण्यासाठी अनिल घोसाळकर यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असून, आपण घोसाळकर यांना जाहीर आवाहन करतो की, त्यांनी आंदोलनाची बाब तर दूरच पण पाठपुरावा केलेली दोन पत्र तरी दाखवावीत आणि नंतरच श्रेयासाठी धडपडावे. आपण ग्रामस्थांच्या साथीने गेली ८ वर्षे अविरत लढा देत असून, कडवई स्थानकाचे काम आता अंतिम टप्यात असताना आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना जास्त महत्व देणार नाही. - जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, मनसेही समिती २००८ साली स्थापन झाली आहे. मात्र, तेव्हापासून पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांबाबत व आंदोलनाबाबत विचारणा केली असता ती उपलब्ध होऊ शकली नाही. आपण कडवई स्थानकाची मागणी करणार आहे.- अनिल घोसाळकर, समिती अध्यक्ष