शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कडवईत श्रेयवादावरून फलकबाजी

By admin | Updated: March 29, 2016 00:23 IST

संगमेश्वर तालुका : रेल्वे स्थानकाच्या मंजुरीवरून जुगलबंदी; प्रस्ताव केंद्राकडे रवाना

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वे स्थानकाच्या मंजुरीवरून आता श्रेयवाद सुरू झाला आहे. या श्रेयवादातूनच याठिकाणी लावण्यात आलेला फलक चर्चेचा विषय बनला आहे. कोकण रेल्वे कडवई रेल्वेस्थानक संघर्ष समितीने लावलेल्या या फलकामुळे संघर्ष समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, या रेल्वेस्थानकाच्या बांधकामाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिले आहे. या स्थानकासाठी मनसेनेच प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.रेल्वेस्थानकाच्या मागणीसाठी २००८ सालापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी अनेक आंदोलने छेडली. कडवई स्थानक बांधकामाचा प्रस्तावही केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, हे होत असताना श्रेयाची लढाई मात्र तीव्र होताना दिसत आहे. कडवई स्थानकासाठी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहेत. वर्षभरापूर्वी याच आंदोलनातून स्थानकाला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने प्रत्यक्ष बांधकामाला विलंब होत आहे. यासाठी नुकताच १५ जानेवारी रोजी ग्रामस्थांच्यावतीने रेलरोकोचा प्रयत्नही करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासनाच्यावतीने सहाय्यक प्रबंधक टी. मंजुनाथ व संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांनी ग्रामस्थांसोबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी करण्यात आलेल्या रेलरोको आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, सदानंद ब्रीद, राजवाडी सरपंच नंदकुमार मांजरेकर यांच्यासह सर्वपक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होेते. रेल्वेस्थानक निर्मितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ८ आॅक्टोबर २०१५ला पाठवण्यात आला असून, कडवईसह कोकण रेल्वे मार्गावरील १० रेल्वेस्थानके व ८ लुपलाईनच्या बांधकाम मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे लेखी पत्र रेल्वे प्र्रशासनाने दिले आहे. मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना अनिल घोसाळकर नामक व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक संघर्ष समिती स्थापन झाली असून, कडवई स्थानकाच्या मागणीसाठी ही समिती प्रयत्न करणार असल्याचे फलक चार दिवसांपूर्वी कडवई परिसरात अनधिकृतरित्या लावण्यात आले आहेत. त्यावर मनसेने आक्षेप घेतल्याने प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जे लोक गेल्या ८ वर्षात झालेल्या एकाही आंदोलनात सहभागी नव्हते आणि त्यांनी अचानक असे फलक झळकावले असल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. हा फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. (वार्ताहर)श्रेय लाटण्यासाठी अनिल घोसाळकर यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असून, आपण घोसाळकर यांना जाहीर आवाहन करतो की, त्यांनी आंदोलनाची बाब तर दूरच पण पाठपुरावा केलेली दोन पत्र तरी दाखवावीत आणि नंतरच श्रेयासाठी धडपडावे. आपण ग्रामस्थांच्या साथीने गेली ८ वर्षे अविरत लढा देत असून, कडवई स्थानकाचे काम आता अंतिम टप्यात असताना आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना जास्त महत्व देणार नाही. - जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, मनसेही समिती २००८ साली स्थापन झाली आहे. मात्र, तेव्हापासून पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांबाबत व आंदोलनाबाबत विचारणा केली असता ती उपलब्ध होऊ शकली नाही. आपण कडवई स्थानकाची मागणी करणार आहे.- अनिल घोसाळकर, समिती अध्यक्ष