शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
3
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
4
“पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
5
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
6
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
7
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
8
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
9
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
10
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
11
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
12
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
13
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
14
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
15
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
16
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
17
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
18
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
19
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
20
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...

वसुलीपेक्षा कागदी घोडे जादा

By admin | Updated: April 8, 2015 23:54 IST

महसूल विभाग : अधिकाऱ्याच्या मनमानीचा शासनाच्या तिजोरीलाही फटका

राजापूर : येथील महसूल विभागातील वामनमूर्ती वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनतेबरोबरच आता शासनाच्या तिजोरीलाही मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. गेल्या वर्षभराच्या काळात लाखो रुपयांची दंडात्मक कारवाईची प्रकरणे वसुलीअभावी पडून आहेत. अपिलात गेलेल्या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणांचे निकाल वेळेवर न दिल्याने व काही प्रकरणांमध्ये बड्या धेंडाना आपल्या अर्थपूर्ण व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात सूट दिल्याने याचा फटका शासकीय उत्पन्नावर झाला आहे. या कार्यालयाची व त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून राजापूर महसूल विभागातील तो अधिकारी व त्याच्या त्रिकुटाच्या कारनाम्यांची चर्चा सर्वत्र खुलेआमपणे सुरु आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेबरोबरच आता महसुली कर्मचाऱ्यांनाही बसू लागल्यामुळे त्यांच्या विरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. या त्रिकुटातल्या गोऱ्या अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या नाहक खोट्या तक्रारी करायला सुरुवात केल्याने महसूल विभागातील कर्मचारी चांगलेच हवालदिल झाले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेले अनधिकृत उत्खनन व त्यावर झालेली दंडात्मक कारवाई वसुलीअभावी कागदी घोेडे नाचवणारीच ठरली आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचे अहवाल पाठवल्यानंतर तालुका महसूल विभागाकडून संबधितांना दंडात्मक रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याच्या नोटीसा पाठवल्या जात असल्या तरी या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यातील काही प्रकरणांना स्थगिती देऊन, तर काही प्रकरणांवर अद्याप काहीच कारवाई केली नसल्याचे दिसून येते.मध्यंतरीच्या कालावधीत उत्खननाच्या परवानगीसाठी काही प्रस्तावही दाखल झाले होते. मात्र, या वरिष्ठ अधिकाऱ्याने विविध प्रकारच्या दाखल्यांप्रमाणेच त्या प्रकरणांवरही अद्याप सह्या न केल्याने ती प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ स्वत:च्या हितासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांवर गोऱ्या साहेबाच्या सांगण्यावरुन कारवाई करण्यात हा वामनमूर्ती वरिष्ठ अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या अधिकाऱ्याची राजापूर तालुक्यातून त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अनेक प्रकरणे उजेडातमहसूल विभागातील कारनाम्याची अनेक प्रकरणे आता पुढे येत आहेत. राजापूरचा महसूल विभाग आणि अर्थपूर्ण कारभार हे आता समीकरण होऊ लागले आहे. काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण विभागच बदनाम होत असून, त्यामध्ये सर्वच महसूल कर्मचारीही भरडले जात असल्याची ओरड कर्मचाऱ्यांमधूनच होत आहे. लाचखोर अधिकाऱ्यांची तालुक्यातून बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.