शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीपेक्षा कागदी घोडे जादा

By admin | Updated: April 8, 2015 23:54 IST

महसूल विभाग : अधिकाऱ्याच्या मनमानीचा शासनाच्या तिजोरीलाही फटका

राजापूर : येथील महसूल विभागातील वामनमूर्ती वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनतेबरोबरच आता शासनाच्या तिजोरीलाही मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. गेल्या वर्षभराच्या काळात लाखो रुपयांची दंडात्मक कारवाईची प्रकरणे वसुलीअभावी पडून आहेत. अपिलात गेलेल्या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणांचे निकाल वेळेवर न दिल्याने व काही प्रकरणांमध्ये बड्या धेंडाना आपल्या अर्थपूर्ण व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात सूट दिल्याने याचा फटका शासकीय उत्पन्नावर झाला आहे. या कार्यालयाची व त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून राजापूर महसूल विभागातील तो अधिकारी व त्याच्या त्रिकुटाच्या कारनाम्यांची चर्चा सर्वत्र खुलेआमपणे सुरु आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेबरोबरच आता महसुली कर्मचाऱ्यांनाही बसू लागल्यामुळे त्यांच्या विरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. या त्रिकुटातल्या गोऱ्या अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या नाहक खोट्या तक्रारी करायला सुरुवात केल्याने महसूल विभागातील कर्मचारी चांगलेच हवालदिल झाले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेले अनधिकृत उत्खनन व त्यावर झालेली दंडात्मक कारवाई वसुलीअभावी कागदी घोेडे नाचवणारीच ठरली आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचे अहवाल पाठवल्यानंतर तालुका महसूल विभागाकडून संबधितांना दंडात्मक रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याच्या नोटीसा पाठवल्या जात असल्या तरी या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यातील काही प्रकरणांना स्थगिती देऊन, तर काही प्रकरणांवर अद्याप काहीच कारवाई केली नसल्याचे दिसून येते.मध्यंतरीच्या कालावधीत उत्खननाच्या परवानगीसाठी काही प्रस्तावही दाखल झाले होते. मात्र, या वरिष्ठ अधिकाऱ्याने विविध प्रकारच्या दाखल्यांप्रमाणेच त्या प्रकरणांवरही अद्याप सह्या न केल्याने ती प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ स्वत:च्या हितासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांवर गोऱ्या साहेबाच्या सांगण्यावरुन कारवाई करण्यात हा वामनमूर्ती वरिष्ठ अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या अधिकाऱ्याची राजापूर तालुक्यातून त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अनेक प्रकरणे उजेडातमहसूल विभागातील कारनाम्याची अनेक प्रकरणे आता पुढे येत आहेत. राजापूरचा महसूल विभाग आणि अर्थपूर्ण कारभार हे आता समीकरण होऊ लागले आहे. काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण विभागच बदनाम होत असून, त्यामध्ये सर्वच महसूल कर्मचारीही भरडले जात असल्याची ओरड कर्मचाऱ्यांमधूनच होत आहे. लाचखोर अधिकाऱ्यांची तालुक्यातून बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.