शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

वसुलीपेक्षा कागदी घोडे जादा

By admin | Updated: April 8, 2015 23:54 IST

महसूल विभाग : अधिकाऱ्याच्या मनमानीचा शासनाच्या तिजोरीलाही फटका

राजापूर : येथील महसूल विभागातील वामनमूर्ती वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनतेबरोबरच आता शासनाच्या तिजोरीलाही मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. गेल्या वर्षभराच्या काळात लाखो रुपयांची दंडात्मक कारवाईची प्रकरणे वसुलीअभावी पडून आहेत. अपिलात गेलेल्या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणांचे निकाल वेळेवर न दिल्याने व काही प्रकरणांमध्ये बड्या धेंडाना आपल्या अर्थपूर्ण व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात सूट दिल्याने याचा फटका शासकीय उत्पन्नावर झाला आहे. या कार्यालयाची व त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून राजापूर महसूल विभागातील तो अधिकारी व त्याच्या त्रिकुटाच्या कारनाम्यांची चर्चा सर्वत्र खुलेआमपणे सुरु आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेबरोबरच आता महसुली कर्मचाऱ्यांनाही बसू लागल्यामुळे त्यांच्या विरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. या त्रिकुटातल्या गोऱ्या अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या नाहक खोट्या तक्रारी करायला सुरुवात केल्याने महसूल विभागातील कर्मचारी चांगलेच हवालदिल झाले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेले अनधिकृत उत्खनन व त्यावर झालेली दंडात्मक कारवाई वसुलीअभावी कागदी घोेडे नाचवणारीच ठरली आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचे अहवाल पाठवल्यानंतर तालुका महसूल विभागाकडून संबधितांना दंडात्मक रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याच्या नोटीसा पाठवल्या जात असल्या तरी या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यातील काही प्रकरणांना स्थगिती देऊन, तर काही प्रकरणांवर अद्याप काहीच कारवाई केली नसल्याचे दिसून येते.मध्यंतरीच्या कालावधीत उत्खननाच्या परवानगीसाठी काही प्रस्तावही दाखल झाले होते. मात्र, या वरिष्ठ अधिकाऱ्याने विविध प्रकारच्या दाखल्यांप्रमाणेच त्या प्रकरणांवरही अद्याप सह्या न केल्याने ती प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ स्वत:च्या हितासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांवर गोऱ्या साहेबाच्या सांगण्यावरुन कारवाई करण्यात हा वामनमूर्ती वरिष्ठ अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या अधिकाऱ्याची राजापूर तालुक्यातून त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अनेक प्रकरणे उजेडातमहसूल विभागातील कारनाम्याची अनेक प्रकरणे आता पुढे येत आहेत. राजापूरचा महसूल विभाग आणि अर्थपूर्ण कारभार हे आता समीकरण होऊ लागले आहे. काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण विभागच बदनाम होत असून, त्यामध्ये सर्वच महसूल कर्मचारीही भरडले जात असल्याची ओरड कर्मचाऱ्यांमधूनच होत आहे. लाचखोर अधिकाऱ्यांची तालुक्यातून बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.