शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

संपली मोहीम, संपली जागृती... मांडवीला अस्वच्छतेचा फेरा

By admin | Updated: November 9, 2014 23:37 IST

तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली होती़

रत्नागिरी : भारत स्वच्छता अभियान राबविण्यात येत असतानाच मांडवी किनारपट्टीवर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेली प्लास्टिकची बॅरल तुडुंब भरली आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथे फिरायला येणाऱ्या लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़  तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली होती़ जिल्हाधिकारीऱ्यांनी भाट्ये, आरे-वारे, मांडवी किनाऱ्यावर दारु पिण्यासाठी बसलेल्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला होता़ या उपक्रमामध्ये शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या व लोकांना सहभाग करुन किनारे स्वच्छता मोहीम राबविली होती़ त्याचवेळी भाट्ये किनारा फिनोलेक्स कंपनी आणि मांडवी किनारा अल्ट्राटेक कंपनीने स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली होती़  या स्वच्छतेच्या वेळी मांडवी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनी कचरा करु नये, यासाठी नऊ ठिकाणी प्लास्टिकची बॅरल ठेवण्यात आली होती़ मांडवी किनारा गतवर्षी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या वेळी चकाचक करण्यात आला होता़ मात्र, त्यानंतर याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. या किनाऱ्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत नसल्याने तेथे दारुच्या बाटल्या, प्लास्टिक किनाऱ्यावर कित्येक दिवस पडलेले असते़ कचरा टाकण्यासाठी लावण्यात येणारी प्लास्टिक बॅरल गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱ्याने तुडुंब भरलेली आहेत़ या बॅरलमधून कचरा वेळीच साफ केला जात नसल्याने दुर्गंधी पसरते. एक बॅरल तर वाहून गेले असून, ते किनाऱ्यावर आडवे झाले आहे़ येथील मारुती मंदिरशेजारीच अल्ट्राटेक कंपनीच्या फलकाला लागून असलेले बॅरल कचऱ्याने भरले असून, किनाऱ्यावर कचरा पसरला आहे. हा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने अस्ताव्यस्त पसरलेला आहे. एकूणच किनारपट्टीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे़ एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना दुसरीकडे कचऱ्याने भरलेली बॅरल साफ करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)मांडवी किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्या, दारुच्या बाटल्या फेकल्या जातात़ हा कचरा वेळीच साफ करण्यासाठी संबंधितांना वेळ मिळत नाही़ त्यामुळे अमावास्या, पौर्णिमेच्या दिवशी उधाणाच्या भरती-ओहोटीची वाट पाहावी लागते. याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे़