शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

संपली मोहीम, संपली जागृती... मांडवीला अस्वच्छतेचा फेरा

By admin | Updated: November 9, 2014 23:37 IST

तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली होती़

रत्नागिरी : भारत स्वच्छता अभियान राबविण्यात येत असतानाच मांडवी किनारपट्टीवर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेली प्लास्टिकची बॅरल तुडुंब भरली आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथे फिरायला येणाऱ्या लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़  तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली होती़ जिल्हाधिकारीऱ्यांनी भाट्ये, आरे-वारे, मांडवी किनाऱ्यावर दारु पिण्यासाठी बसलेल्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला होता़ या उपक्रमामध्ये शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या व लोकांना सहभाग करुन किनारे स्वच्छता मोहीम राबविली होती़ त्याचवेळी भाट्ये किनारा फिनोलेक्स कंपनी आणि मांडवी किनारा अल्ट्राटेक कंपनीने स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली होती़  या स्वच्छतेच्या वेळी मांडवी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनी कचरा करु नये, यासाठी नऊ ठिकाणी प्लास्टिकची बॅरल ठेवण्यात आली होती़ मांडवी किनारा गतवर्षी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या वेळी चकाचक करण्यात आला होता़ मात्र, त्यानंतर याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. या किनाऱ्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत नसल्याने तेथे दारुच्या बाटल्या, प्लास्टिक किनाऱ्यावर कित्येक दिवस पडलेले असते़ कचरा टाकण्यासाठी लावण्यात येणारी प्लास्टिक बॅरल गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱ्याने तुडुंब भरलेली आहेत़ या बॅरलमधून कचरा वेळीच साफ केला जात नसल्याने दुर्गंधी पसरते. एक बॅरल तर वाहून गेले असून, ते किनाऱ्यावर आडवे झाले आहे़ येथील मारुती मंदिरशेजारीच अल्ट्राटेक कंपनीच्या फलकाला लागून असलेले बॅरल कचऱ्याने भरले असून, किनाऱ्यावर कचरा पसरला आहे. हा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने अस्ताव्यस्त पसरलेला आहे. एकूणच किनारपट्टीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे़ एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना दुसरीकडे कचऱ्याने भरलेली बॅरल साफ करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)मांडवी किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्या, दारुच्या बाटल्या फेकल्या जातात़ हा कचरा वेळीच साफ करण्यासाठी संबंधितांना वेळ मिळत नाही़ त्यामुळे अमावास्या, पौर्णिमेच्या दिवशी उधाणाच्या भरती-ओहोटीची वाट पाहावी लागते. याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे़