शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

राष्ट्रीय पीक विमा योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST

रत्नागिरी जिल्हा : खरीपासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न.

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व ६५ महसूल मंडलांना भात व नागली पिकासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता विमा उतरवण्याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लागू आहे. ६० टक्के जोखीम स्तरानुसार भात पिकाकरिता १५ हजार रुपये विमा रकमेसाठी २.५० टक्के हप्त्याप्रमाणे ३७५ रुपये प्रतिहेक्टर भरावेत. तसेच ८० टक्के जोखीम स्तरानुसार नाचणी पिकाकरिता १२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रकमेसाठी २.५० टक्के हप्त्याप्रमाणे हेक्टरी ३१२.५ रुपये रक्कम भरावयाची आहे. भातशेतीच्या ज्या शेतकऱ्यांना जादा रक्कम विमा संरक्षित करावयाची आहे, त्यांना उंबरठा उत्पन्नात १५० टक्केपर्यंत अतिरिक्त संरक्षण देता येते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त १२ टक्के हप्ता म्हणजेच एकूण ३७ हजार ४०० रुपये प्रतिहेक्टरी रक्कम संरक्षित होण्यासाठी ३ हजार ६३ रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे. नागली पिकासाठी अतिरिक्त संरक्षण २३ हजार ५०० रुपयांपर्यंत लागू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त ८ टक्केम्हणजे २३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी संरक्षण रकमेसाठी ११९२.५ विमा हप्ता द्यावा लागणार आहे. भात व नागली पीक विमा हप्त्यात अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी १० टक्के सूट मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणारी विमा योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. योजना १६ आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)