शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राष्ट्रीय पीक विमा योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST

रत्नागिरी जिल्हा : खरीपासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न.

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व ६५ महसूल मंडलांना भात व नागली पिकासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता विमा उतरवण्याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लागू आहे. ६० टक्के जोखीम स्तरानुसार भात पिकाकरिता १५ हजार रुपये विमा रकमेसाठी २.५० टक्के हप्त्याप्रमाणे ३७५ रुपये प्रतिहेक्टर भरावेत. तसेच ८० टक्के जोखीम स्तरानुसार नाचणी पिकाकरिता १२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रकमेसाठी २.५० टक्के हप्त्याप्रमाणे हेक्टरी ३१२.५ रुपये रक्कम भरावयाची आहे. भातशेतीच्या ज्या शेतकऱ्यांना जादा रक्कम विमा संरक्षित करावयाची आहे, त्यांना उंबरठा उत्पन्नात १५० टक्केपर्यंत अतिरिक्त संरक्षण देता येते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त १२ टक्के हप्ता म्हणजेच एकूण ३७ हजार ४०० रुपये प्रतिहेक्टरी रक्कम संरक्षित होण्यासाठी ३ हजार ६३ रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे. नागली पिकासाठी अतिरिक्त संरक्षण २३ हजार ५०० रुपयांपर्यंत लागू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त ८ टक्केम्हणजे २३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी संरक्षण रकमेसाठी ११९२.५ विमा हप्ता द्यावा लागणार आहे. भात व नागली पीक विमा हप्त्यात अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी १० टक्के सूट मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणारी विमा योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. योजना १६ आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)