शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

तटबंदीसाठी किल्ल्यातच उत्खनन

By admin | Updated: January 3, 2017 23:18 IST

सिंधुदुर्ग किल्ल्यातील प्रकार : शिवप्रेमी, रहिवाशांत तीव्र संताप; ऐतिहासिकपणाला बाधा

मालवण : गेली ३५० वर्षे अथांग सागराच्या अजस्त्र लाटा झेलणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गची गेल्या काही वर्षांत पडझड झाली होती. त्यामुळे ढासळलेल्या तटबंदीचे काम ‘पुरातत्त्व’ विभागाकडून चार वर्षे युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असताना तटबंदी बांधकामासाठी किल्ल्यातील नैसर्गिक खडकाळ भाग तसेच वाळू उत्खनन करण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या ऐतिहासिकपणाला धोका निर्माण झाला असून याबाबत रहिवासी व किल्लेप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पुरातत्त्व विभागाकडून किल्ले सिंधुदुर्गचे ढासळलेले तीन बुरुज व एका भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. तटबंदीच्या कामासाठी ३४ कुशल कारागीर काम करीत आहेत. काम अंतिम टप्प्यात आले असताना काही शिवप्रेमींनी सोशल मीडियावर किल्ल्यातीलच खडकाळ भाग फोडलेले व वाळू उत्खनन होत असलेले छायाचित्र प्रसारित केल्याने तटबंदीच्या कामाबाबत आणि पुरातत्त्व विभागाच्या कारभाराबाबत शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतच्या धक्कादायक प्रकाराला किल्ले रहिवाशांनीही दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)वाळू उत्खननाचे खड्डेतटबंदीसाठी लागणारी वाळूही येथूनच उत्खनन केली जात असल्याने त्याठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. किल्ल्यातीलच दगडांप्रमाणे व वाळूचे उत्खनन होत असल्याचा खळबळजनक आरोप किल्ले रहिवासी यांच्यावतीने करण्यात आला आहे.कुठलेही उत्खनन केले नाही किरकोळ प्रमाणात तटबंदीचे दगड जोडणीसाठी किल्ल्यातील दगड वापरण्यात आले आहेत. बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळूही अत्यल्प प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारे दगड व वाळूचे उत्खनन होत नाही. यामुळे किल्ल्याच्या ऐतिहासिकपणाला कोणताही धोका पोहोचणार नाही.-हरीश गुजराथी, पुरातत्त्व विभागाचे किल्लेदार