शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

तटबंदीसाठी किल्ल्यातच उत्खनन

By admin | Updated: January 3, 2017 23:18 IST

सिंधुदुर्ग किल्ल्यातील प्रकार : शिवप्रेमी, रहिवाशांत तीव्र संताप; ऐतिहासिकपणाला बाधा

मालवण : गेली ३५० वर्षे अथांग सागराच्या अजस्त्र लाटा झेलणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गची गेल्या काही वर्षांत पडझड झाली होती. त्यामुळे ढासळलेल्या तटबंदीचे काम ‘पुरातत्त्व’ विभागाकडून चार वर्षे युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असताना तटबंदी बांधकामासाठी किल्ल्यातील नैसर्गिक खडकाळ भाग तसेच वाळू उत्खनन करण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या ऐतिहासिकपणाला धोका निर्माण झाला असून याबाबत रहिवासी व किल्लेप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पुरातत्त्व विभागाकडून किल्ले सिंधुदुर्गचे ढासळलेले तीन बुरुज व एका भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. तटबंदीच्या कामासाठी ३४ कुशल कारागीर काम करीत आहेत. काम अंतिम टप्प्यात आले असताना काही शिवप्रेमींनी सोशल मीडियावर किल्ल्यातीलच खडकाळ भाग फोडलेले व वाळू उत्खनन होत असलेले छायाचित्र प्रसारित केल्याने तटबंदीच्या कामाबाबत आणि पुरातत्त्व विभागाच्या कारभाराबाबत शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतच्या धक्कादायक प्रकाराला किल्ले रहिवाशांनीही दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)वाळू उत्खननाचे खड्डेतटबंदीसाठी लागणारी वाळूही येथूनच उत्खनन केली जात असल्याने त्याठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. किल्ल्यातीलच दगडांप्रमाणे व वाळूचे उत्खनन होत असल्याचा खळबळजनक आरोप किल्ले रहिवासी यांच्यावतीने करण्यात आला आहे.कुठलेही उत्खनन केले नाही किरकोळ प्रमाणात तटबंदीचे दगड जोडणीसाठी किल्ल्यातील दगड वापरण्यात आले आहेत. बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळूही अत्यल्प प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारे दगड व वाळूचे उत्खनन होत नाही. यामुळे किल्ल्याच्या ऐतिहासिकपणाला कोणताही धोका पोहोचणार नाही.-हरीश गुजराथी, पुरातत्त्व विभागाचे किल्लेदार