शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

माजी सैनिकांचीही जात, धर्मात विभागणी

By admin | Updated: September 24, 2015 00:13 IST

रत्नागिरी : आजी - माजी सैनिकांच्या मेळाव्यात खंत व्यक्त

रत्नागिरी : सैनिक देशासाठी लढतो, त्याला भ्रष्टाचार माहीत नाही. तो कुठलीही जात, धर्म पाहात नाही. पण राजकीयस्तरावर शासनाकडून त्याची जात आणि धर्मामध्ये विभागणी केली जातेय, आजी माजी सैनिकांना ‘व्हाईट कार्ड’ दिल्याने त्यांना रेशन दुकानावर धान्य, केरोसीन मिळत नाही. आजही शासनदरबारी आमची अपेक्षाच होते. आम्हाला वेळेवर दाखले मिळतात का, अशा अनेक व्यथा आजच्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात व्यक्त झाल्या.भारत पाक युद्ध विजयाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. विजयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राज्याचा सैनिक कल्याण विभाग, तसेच माजी सैनिक संघटना, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग यांच्या विद्यमाने माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या युद्धात तसेच इतरही युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींचा तसेच शौर्यपदक मिळालेल्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त सुभेदार अंकुश चव्हाण, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे (मेस्को) कर्नल देशपांडे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पीटर डॉन्टस, कर्नल शशिकांत सुर्वे, मेजर प्रकाश आंब्रे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, फिनोलेक्सचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आशुतोष मुळ्ये आदी उपस्थित होते.रत्नागिरी जिल्ह्यातील २८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अशा एकूण ५१ जणांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी १९६५ च्या युद्धाच्या आठवणी काही मान्यवरांनी व्यक्त केल्या. १९७१च्या भारत - पाक युद्धात सहभागी असलेले कर्नल शशिकांत सुर्वे, १९६२, १९६५ आणि १९७१ या तीनही युद्धात कामगिरी केलेले आणि वीरचक्र मिळालेले सुभेदार अंकुश चव्हाण यांनी या युद्धांच्या काही आठवणी जागृत केल्या. भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पीटर डॉन्टस यांनी माजी सैनिकाला आज अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, ही भावना व्यक्त करतानाच राजकारणी व्यक्ती आणि शासनावर ताशेरे ओढले. माजी सैनिकांना आज जातीपातीच्या तुकड्यात विभागले जातेय, हे थांबवायला हवे, असे ते म्हणाले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सैनिकांसाठी ४ हेक्टर शेतजमीन आणि घरासाठी भूखंड देण्याबाबतची अंमलबजावणी होण्यासाठी आजच्या बैठकीत सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात येतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित करंदीकर यांनी केले. (प्रतिनिधी)अमेरिकेने आपले मित्र राष्ट्र पाकिस्तानला दिलेला अभेद्य रणगाडा नष्ट करणे, भारतापुढे आव्हानच होते. तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनी अणुऊर्जेचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पहिल्यांदाच या युद्धात अणुऊर्जेचा वापर करून रणगाडा उद्ध्वस्त करण्यात आला.