शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पोलिसांना मित्र मानून प्रत्येकाने सहकार्य करावे

By admin | Updated: November 23, 2015 00:03 IST

स्नेहलता चोरगे : वैभववाडी शहरातून पोलिसांतर्फे प्रभात फेरी

वैभववाडी : समाज जागृत असतो तिथे गुन्ह्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे समाजाने पोलिसांना आपले मित्र मानून सहकार्याची भूमिका ठेवणे आवश्यक आहे. वर्दीवरील पोलिसातील माणूस आतून फारच वेगळा असतो. त्यांच्या या दुहेरी भुमिकेमुळेच समाजव्यवस्था सुदृढ आहे, असे प्रतिपादन महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी येथे केले.वैभववाडी पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून रविवारी ‘पोलीस मित्र’ प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यापासून अ. रा. विद्यालय, दत्तमंदिर ते संभाजी चौक अशी प्रभात फेरी काढल्यानंतर चौकात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एस. के. घाडगे, आर डी गुरव, पंचायत समिती सदस्य बंड्या मांजरेकर, शुभांगी पवार, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, संदीप पाटील, नगरसेवक रवींद्र रावराणे, उद्योगपती विकास काटे, प्रा. एस. एन. पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज सावंत, तालुक्यातील सरपंच, व महाविद्यालयान विद्यार्थी उपस्थित होते.चोरगे पुढे म्हणाल्या, समाजात अनेक घटना घडत असतात. त्यातील काही घटना गुन्हेगारी स्वरुपाच्या असतात. अशा घटनांबाबत नागरीकांनी तत्काळ पोलीसांना माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा दिल्लीतील ‘निर्भया’पासून कणकवलीतील सामूहिक अत्याचारासारखी प्रकरणे घडत राहतात. तरुण पिढीने आपल्याकडील साधनांचा वापर मर्यादितच करण्याची गरज आहे. कारण मोबाईलच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट यांच्या अतिवापरामुळे आपण नकळत एखाद्या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता अधिक आहे.उपनिरीक्षक गुरव म्हणाले, कोणत्याही व्यक्तीची अडचण असेल तर मध्यस्थ न घालता थेट पोलीसांकडे यावे, त्याची बाजू समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत बसवून शक्य तेवढे सहकार्य आम्ही करीत असतो. मात्र, नियम मोडायचा आणि वर मध्यस्थांमार्फत आम्हालाही नियमबाह्य काम करायला सांगायचे ही वृत्तीच पूर्णपणे चुकीची आहे. तरुण पिढी हे देशाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे तरुणाईने चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी संदीप पाटील पाटील, विकास काटे, तसेच आनंदीबाई व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या फेरीमध्ये संजय खाडे, शिंगाडे, एस एस कदम आदी पोलीस कर्मचारी सहभागी होते. पोलीस नाईक हरकुळकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. (प्रतिनिधी)