शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

By admin | Updated: September 13, 2015 22:13 IST

दोघे बचावले : रत्नागिरी तालुक्यातील दुर्घटना, मृतांत दोघे इचलकरंजीचे, तर भाट्ये, पूर्णगडमधील दोघांचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यासाठी रविवार हा घातवार ठरला. काही तासांच्या फरकाने तीन विविध ठिकाणी समुद्रामध्ये सहाजण बुडाले. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. विलास गोपाळ भाटकर, ब्रीजकिशोर सोनी, नरसिंग शेडशाळे व नंदकुमार महादेव आंबेकर अशी मृतांची नावे आहेत. सोनी व शेरसादे हे इचलकरंजीमधील आहेत.रविवारी सकाळी १० ते १२च्या सुमारास विलास गोपाळ भाटकर (वय ४५, भाट्ये) हे आपल्या दोन मित्रांसह भाट्ये समुद्रकिनारी झरीविनायक मंदिरासमोरच्या सागरी परिसरामध्ये पोहण्यासाठी गेले. पोहता येत नसल्याने भाटकरांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.दुसऱ्या एका घटनेमध्ये इचलकरंजी येथील चार पर्यटक गणेशगुळे समुद्रकिनारी आले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये पोहण्याचा मोह आवरला नाही. चौघेही सकाळी ११.४५च्या सुमारास गणेशगुळे समुद्रकिनारी पोहत असता ब्रीजकिशोर सोनी (३०) व नरसिंग शेडशाळे (४५, दोन्ही राहणार इचलकरंजी) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला. त्यांचे अन्य दोन मित्रही त्यांच्याबरोबर पाण्यामध्ये गेले होते. मात्र त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यांची नावे उशिरापर्यंत पोलिसांकडेही उपलब्ध नव्हती.तालुक्यातील मुख्य मासेमारी बंदर समजल्या जाणाऱ्या मिरकरवाडा समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या नौकेवरील खलाशी नंदकुमार महादेव आंबेकर (३५, पूर्णगड) हे पाण्यात पडून मृत झाले. इम्तिहाज सारंग यांच्या मासेमारी नौकेवर काम करीत असताना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नंदकुमार यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. (वार्ताहर)इचलकरंजीत शोककळा--नरसिंग शेडशाळे यांचे इचलकरंजी येथे बंगला रोडवर परफेक्ट एजन्सीज नावाचे दुकान असून, ते दुकानाच्या मागील बाजूस कुटुंबीयांसह राहत होते. तसेच ब्रीजकुमार सोनी हे ‘आयडिया’ या मोबाईल कंपनीमध्ये क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक होते. ते सांगली रोडवर एका सदनिकेत राहत होते. या दोघांचेही समुद्रामध्ये बुडून निधन झाल्याचे वृत्त समजताच त्या परिसरामध्ये शोककळा पसरली होती. रात्री उशिरापर्यंत दोघांचेही मृतदेह इचलकरंजीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते.पर्यटकांच्या सुरक्षेचे काय?--जिल्हाभरात काही दिवसातच अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अपघातानंतर ही सुरक्षा यंत्रणा जैसे थे असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या माहितीसाठी किमान या ठिकाणी आवश्यक फलक लावणे गरजेचे बनले आहे.