शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

By admin | Updated: September 13, 2015 22:13 IST

दोघे बचावले : रत्नागिरी तालुक्यातील दुर्घटना, मृतांत दोघे इचलकरंजीचे, तर भाट्ये, पूर्णगडमधील दोघांचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यासाठी रविवार हा घातवार ठरला. काही तासांच्या फरकाने तीन विविध ठिकाणी समुद्रामध्ये सहाजण बुडाले. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. विलास गोपाळ भाटकर, ब्रीजकिशोर सोनी, नरसिंग शेडशाळे व नंदकुमार महादेव आंबेकर अशी मृतांची नावे आहेत. सोनी व शेरसादे हे इचलकरंजीमधील आहेत.रविवारी सकाळी १० ते १२च्या सुमारास विलास गोपाळ भाटकर (वय ४५, भाट्ये) हे आपल्या दोन मित्रांसह भाट्ये समुद्रकिनारी झरीविनायक मंदिरासमोरच्या सागरी परिसरामध्ये पोहण्यासाठी गेले. पोहता येत नसल्याने भाटकरांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.दुसऱ्या एका घटनेमध्ये इचलकरंजी येथील चार पर्यटक गणेशगुळे समुद्रकिनारी आले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये पोहण्याचा मोह आवरला नाही. चौघेही सकाळी ११.४५च्या सुमारास गणेशगुळे समुद्रकिनारी पोहत असता ब्रीजकिशोर सोनी (३०) व नरसिंग शेडशाळे (४५, दोन्ही राहणार इचलकरंजी) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला. त्यांचे अन्य दोन मित्रही त्यांच्याबरोबर पाण्यामध्ये गेले होते. मात्र त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यांची नावे उशिरापर्यंत पोलिसांकडेही उपलब्ध नव्हती.तालुक्यातील मुख्य मासेमारी बंदर समजल्या जाणाऱ्या मिरकरवाडा समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या नौकेवरील खलाशी नंदकुमार महादेव आंबेकर (३५, पूर्णगड) हे पाण्यात पडून मृत झाले. इम्तिहाज सारंग यांच्या मासेमारी नौकेवर काम करीत असताना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नंदकुमार यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. (वार्ताहर)इचलकरंजीत शोककळा--नरसिंग शेडशाळे यांचे इचलकरंजी येथे बंगला रोडवर परफेक्ट एजन्सीज नावाचे दुकान असून, ते दुकानाच्या मागील बाजूस कुटुंबीयांसह राहत होते. तसेच ब्रीजकुमार सोनी हे ‘आयडिया’ या मोबाईल कंपनीमध्ये क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक होते. ते सांगली रोडवर एका सदनिकेत राहत होते. या दोघांचेही समुद्रामध्ये बुडून निधन झाल्याचे वृत्त समजताच त्या परिसरामध्ये शोककळा पसरली होती. रात्री उशिरापर्यंत दोघांचेही मृतदेह इचलकरंजीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते.पर्यटकांच्या सुरक्षेचे काय?--जिल्हाभरात काही दिवसातच अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अपघातानंतर ही सुरक्षा यंत्रणा जैसे थे असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या माहितीसाठी किमान या ठिकाणी आवश्यक फलक लावणे गरजेचे बनले आहे.