शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

घरपट्टी भरल्यानंतरही पालिकेने ठोकले घराला सील

By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST

वसुली पथकाने सील ठोकल्याने ८५ वर्षांच्या आईसह आपल्याला बेघर व्हावे लागले.

वेंगुर्ले : थकीत घरपट्टी वसुली मोहिमेत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत घरपट्टी भरूनही घराला सील मारण्याची व पैसे भरण्याबाबतची विनंती करूनही घरांना सील मारण्याच्या घटना ३१ मार्च रोजी घडल्या. याबाबत घरपट्टीधारकाने पैसे भरल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून देताच मारलेले सील काढण्यात आले. तर सील मारल्याने बेघरची परिस्थिती उद्भवलेल्या महिला नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सील काढण्याची विनंती करूनही अद्यापपर्यंत सील काढलेले नाही. दरम्यान, थकीत घरपट्टी वसुलीसाठी आलेल्या नगरपरिषदेच्या पथकाने वेंगुर्ले, कॅम्प-म्हाडा वसाहतीतील एम २५ मधील अ‍ॅड. सुप्रिया देसाई यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये घरपट्टी भरू नही त्यांच्या घरास सिल केले. मात्र, घरपट्टी भरल्याचा पुरावा दाखविताच सील काढण्यात आले. तर दूरध्वनीद्वारे तीन दिवसांनी म्हणजे ३० मार्च रोजी घरपट्टी भरते, असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केला. या वसुली पथकाने सील ठोकल्याने ८५ वर्षांच्या आईसह आपल्याला बेघर व्हावे लागले. नगरपरिषदेने केलेली कारवाई अन्यायकारक असून नगरपरिषदेला सील काढण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी वेंगुर्ले-भटवाडी येथील वनिता मांजरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. भटवाडी येथील घर नं. ३००, वॉर्ड नं. ३ मध्ये आपण आईसह राहत आहोत. दोन खोल्या असलेल्या मातीच्या भिंतीचे आमचे घर आहे. घरपट्टीत वाढ करताना आमचे घर मातीचे असल्याने घरपट्टी कमी करण्याची मागणी केली होती. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. माझी आई वारंवार आजारी असल्याने तिच्या औषधपाण्यासाठी मोठा खर्च होतो. मी घटस्फोटीत असून दोन व्यक्तींचा चरितार्थ चालविण्यासाठी आपल्याकडे भक्कम असा आर्थिक स्त्रोत नाही. केवळ मोलमजुरी करून आपण आईचा सांभाळ करीत आहे. आमची ही परिस्थिती पालिका कर्मचाऱ्यांना माहिती असून आम्ही घरी नसताना घरपट्टी वसुली पथकाने थकीत घरपट्टीमुळे घरास सील ठोकले आहे. त्यामुळे आपण बेघर झालो असून सध्या घराशेजारी उघड्यावर राहत आहोत.नगरपरिषद प्रशासनास आमच्या घराचे सील काढण्याच्या सूचना देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वनिता मांजरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (प्रतिनिधी)