शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

भूसंपादनाच्या प्रक्रियेत त्रुटी?

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

महामार्ग चौपदरीकरण : भूखंडधारकांमध्ये संभ्रमावस्थेचे वातावरण

पाली : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. मे व जून महिन्यात रत्नागिरी तालुक्यातील गावांमध्ये भूसंपादन पूर्व मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. आता भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरु झाली असली तरी त्यात अनेक त्रुटी असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. त्यामुळे ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत.रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा, झरेवाडी, वेळवंड, निवळी - रावणंगवाडी, तारवेवाडी, चरवेली, नागलेवाडी, मराठेवाडी, खानू, पाली या गावांच्या भूसंपादनासाठीची प्राथमिक सूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. महामार्गालगत असूनही ज्या भूखंडांचे भूसंपादन पूर्व मोजणीत सीमांकन झाले आहे. मात्र, राजपत्रामधील सूचनेमध्ये अंशत: जमीन संपादनात त्याच्या क्रमांकाची नोंद नाही. शिवाय या सूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत हरकती नोंदवायच्या आहेत. त्यामुळे आता तीही मुदत संपत आली आहे. तांत्रिक कारणाने जर क्षेत्रांची नोंद प्रसिद्ध झाली नसेल तर संबंधितांना त्याला हरकत घेता येणार नाही. त्यामुळे आम्ही संभ्रमावस्थेत आहोत, असे महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, पालीतर्फे सांगण्यात आले.पालीमधील काही जमिनी या महामार्गासाठी संपादीत होत असल्या तरी त्यांच्यासोबतच लगतच्या अन्य भूखंडधारकांनाही या सूचनेमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याने तेही गोंधळात सापडले आहेत. शिवाय यासंदर्भात संबंधित विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे भूखंडधारक संभ्रमावस्थेत आहेत. भू संपादनाच्या प्रक्रियेत ग्रामस्थांना अंधारात ठेवून कोणतेही काम न करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. (वार्ताहर)पाली येथे पर्यायी बाह्यवळण मार्गालाही तत्वत: मंजुरी मिळाली असून, काही दिवसांपूर्वी याच पर्यायी बाह्यवळण मार्गासाठीची सर्वेक्षण प्रक्रिया करण्यासाठी संबंधित विभागांना आदेश प्राप्त झाले आहेत. सध्या याच महामार्गावर चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवली जात असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. पालीतील काही भूखंडधारकांना तर भूमी अभिलेख विभागाकडूनही भूखंडाचे कमी जास्त पत्रक करण्याच्या संदर्भातील पत्र आली आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे पालीसह परिसरातील ग्रामस्थ या भूसंपादन प्रक्रियेमुळे गोंधळून गेले आहेत. त्यामुळे याबाबत योग्य ती माहिती ग्रामस्थांना देण्याची मागणी करण्यात येत आहे.प्रभाकर राऊत : बाह्यवळण मार्गालाही तत्वत: मान्यतायोग्य माहितीमुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, ही मोहीम राबविताना पाली येथील ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे असून, त्यांना योग्य माहिती देण्याची गरज आहे.