शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

समतेचे हक्क आंबेडकरांमुळे मिळाले

By admin | Updated: October 16, 2015 22:39 IST

नीतेश राणे : मिठमुंबरी येथील बौद्ध विहाराचा जीर्णोद्धार सोहळा

देवगड : गेली ६५ वर्षे डॉ. आंबेडकरांच्या विचारावर आधारित देशाचा कारभार सुरू आहे. सर्व घटकांना समान हक्क व संधी आपल्याला घटनेने मिळवून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाटा मोठा असल्याचे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.मिठमुंबरी येथील आनंद विकास मंडळ या मंडळाच्यावतीने येथील ३२ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बुद्ध विहाराचा जीर्णोद्धार सोहळा बुधवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणे उपस्थित होते. यावेळी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे मुंबई अध्यक्ष मधुकर कांबळे, देवगड सभापती डॉ. मनोज सारंग, नायब तहसीलदार अशोक शेळके, मंडळ अधिकारी सतीश जाधव, मंडळाचे अध्यक्ष भाऊ मुंबरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, मुंबई सेवा संघाचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश जाधव, लहू कांबळे, सुधीर कांबळे, विनायक मिठबांवकर, ग्रामपंचायत सदस्या दक्षता मुंबरकर, पोलीसपाटील दयानंद मुंबरकर, नरेश पाटील, मुंबई मंडळाचे सदस्य यशपाल मुंबरकर, प्रवीण मुंबरकर, आदी उपस्थित होते.यावेळी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भूमिपूजन करण्यात आले, तर देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे मुंबई अध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी राणे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे विचार साऱ्या जगाला व देशाला प्रेरणादायी आहेत. पुढील काळामध्ये या देशाला कोणत्या मार्गाने जायचे आहे याची माहिती विचारातून देणारा एकमेव महामानव म्हणजेच डॉ. आंबेडकर आहेत. लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या कल्याणासाठी गौतम बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने जायला हवे हा विचारही त्यांनी दिला आहे. जनतेच्या कल्याणासाठी लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी दिली आहे. समाजातील सर्व घटकांना, स्त्रियांना समान हक्क प्राप्त करून दिले. डॉ. आंबेडकरांचे उपकार सर्व समाजावर आहेत. त्यांच्याच विचाराने आज देश चालत असून, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मिठमुंबरी येथील बौद्ध विहारामध्ये भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्याचे काम निश्चित येथील सुज्ञ लोक करतील. या विहाराच्या कामकाजासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मधुकर कांबळेंची पाच लाखांची देणगीयावेळी मधुकर कांबळे यांनी विहाराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाखांची देणगी दिली. त्यांचा धनादेश अध्यक्ष मुंबरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. जाधव यांनीही विचार मांडले. यावेळी मधुकर कांबळे यांच्या हस्ते नरेश डामरी यांचा, तर आमदार राणे यांच्या हस्ते मंडळाचे सल्लागार नारायण मुंबरकर, यशपाल मुंबरकर, प्रवीण मुंबरकर यांचा सत्कार करण्यात आला. भाऊ मुंबरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, तर राजेंद्र मुंबरकर यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास मुंबरकर यांनी आभार मानले.