शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पर्यावरणास पूरक बांधकामे हवी

By admin | Updated: July 8, 2014 23:17 IST

वृक्ष संवर्धनाची गरज : रो हाऊस प्रकल्पांसाठी जंगलांची बेसुमार तोड

रामचंद्र कुडाळकर- तळवडे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. या जिल्ह्यात मोठमोठे रो हाऊस बंगले, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट उभे होत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. त्यामुळे प्रोजेक्टचे, रो हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कोकणात पायाभूत सुविधा असणाऱ्या बंगल्यांचे बांधकाम केल्यास जिल्ह्यातील आरोग्यजीवन नक्कीच आनंदी राहील. भारतात २३ टक्के जमीन शेतीखाली आहे व इतर पडीक आहे. म्हणून जर स्वस्त घरे कोकणात उपलब्ध करायची असल्यास त्याची तशी रचना व पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. आज एखादे बांधकाम करावयाचे असल्यास पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. पक्के डांबरी रस्ते व त्यावरील दिवाबत्ती, मुबलक वीज प्रकल्प उभारण्यास तत्काळ मंजुरी मिळणे, ग्रामीण भागातील प्रकल्पास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. स्टॅम्प ड्युटी- शहरी भागापेक्षा निम्मी स्टॅम्प ड्युटी आवश्यक आहे. ग्रामीण भागातील दर पूर्वी होता तो कायम करणे म्हणजे मोकळ्या पडीक जागेत जास्तीत जास्त प्रकल्प होतील. आज मुंबईसारख्या शहरात १ चौरस फूट जागेवरच १३ लोक राहतात. म्हणजेच लोकांची घनता विनाशक आहे. जर बुलेट ट्रेनसारखा प्रोजेक्ट सिंंधुदुर्गात सुरू झाल्यास लोक कोकणातून एका तासात मुंबईला जाऊ शकतील. शहरात बांधकाम व्यवसायात भरपूर नफा आहे. आयकराचे नियम शहरी भाग व ग्रामीण भाग असे भिन्न असले पाहिजेत. बांधकाम इन्कम टॅक्स व वेट ट्रॅक्स व सेवा कर ग्रामीण भागासाठी वेगळा लावावा. पर्यटन जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक करायचा असेल, तर या सर्व बाबींचा विचार व्हायला हवा. बांधकाम व्यवसाय ग्रामीण भागात वाढला तर शहरावरचा ताण कमी होईल व आपोआप पडीक जमिनीचा विकास होईल. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिरींना आडवे बोअर मारून दिल्यास येथील शेतकरी बारमाही शेती करेल. सद्यस्थितीत आजारपणाचे प्रमाण वाढले आहे. आज प्रत्येक माणूस दिवसातून २१,६०० वेळा श्वास घेतो. २.६ ते २.८ किलोग्रॅम प्राणवायू स्वत:साठी वापरतो. ज्याचे आजचे बाजारमूल्य २१,००० आहे. म्हणजेच जर आपल्याला दररोज २१००० रुपयांचा प्राणवायू लागत असेल, तर तो निसर्गाला परत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शालेय जीवनात प्रशालेत पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार झाडे लावण्यास सांगणे, त्यांची देखरेख करण्यास सांगणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर असे संस्कार झाले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्याबाबत गुणात्मक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे तसेच विदेशी झाडे (उदा. मन्जीयम, रेनट्री, नीलगिरी, सुबामुळ, ग्लिरिसीरिडिया, कासमास, सिल्व्हर ओक, काशीद आदी) लावण्यापासून परावृत्त करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक झाडे प्रत्येकाने लावली पाहिजेत. वड, जांभूळ, निम, शिसम अशा विविध झाडांची लागवड करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.