शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

पर्यावरणास पूरक बांधकामे हवी

By admin | Updated: July 8, 2014 23:17 IST

वृक्ष संवर्धनाची गरज : रो हाऊस प्रकल्पांसाठी जंगलांची बेसुमार तोड

रामचंद्र कुडाळकर- तळवडे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. या जिल्ह्यात मोठमोठे रो हाऊस बंगले, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट उभे होत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. त्यामुळे प्रोजेक्टचे, रो हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कोकणात पायाभूत सुविधा असणाऱ्या बंगल्यांचे बांधकाम केल्यास जिल्ह्यातील आरोग्यजीवन नक्कीच आनंदी राहील. भारतात २३ टक्के जमीन शेतीखाली आहे व इतर पडीक आहे. म्हणून जर स्वस्त घरे कोकणात उपलब्ध करायची असल्यास त्याची तशी रचना व पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. आज एखादे बांधकाम करावयाचे असल्यास पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. पक्के डांबरी रस्ते व त्यावरील दिवाबत्ती, मुबलक वीज प्रकल्प उभारण्यास तत्काळ मंजुरी मिळणे, ग्रामीण भागातील प्रकल्पास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. स्टॅम्प ड्युटी- शहरी भागापेक्षा निम्मी स्टॅम्प ड्युटी आवश्यक आहे. ग्रामीण भागातील दर पूर्वी होता तो कायम करणे म्हणजे मोकळ्या पडीक जागेत जास्तीत जास्त प्रकल्प होतील. आज मुंबईसारख्या शहरात १ चौरस फूट जागेवरच १३ लोक राहतात. म्हणजेच लोकांची घनता विनाशक आहे. जर बुलेट ट्रेनसारखा प्रोजेक्ट सिंंधुदुर्गात सुरू झाल्यास लोक कोकणातून एका तासात मुंबईला जाऊ शकतील. शहरात बांधकाम व्यवसायात भरपूर नफा आहे. आयकराचे नियम शहरी भाग व ग्रामीण भाग असे भिन्न असले पाहिजेत. बांधकाम इन्कम टॅक्स व वेट ट्रॅक्स व सेवा कर ग्रामीण भागासाठी वेगळा लावावा. पर्यटन जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक करायचा असेल, तर या सर्व बाबींचा विचार व्हायला हवा. बांधकाम व्यवसाय ग्रामीण भागात वाढला तर शहरावरचा ताण कमी होईल व आपोआप पडीक जमिनीचा विकास होईल. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिरींना आडवे बोअर मारून दिल्यास येथील शेतकरी बारमाही शेती करेल. सद्यस्थितीत आजारपणाचे प्रमाण वाढले आहे. आज प्रत्येक माणूस दिवसातून २१,६०० वेळा श्वास घेतो. २.६ ते २.८ किलोग्रॅम प्राणवायू स्वत:साठी वापरतो. ज्याचे आजचे बाजारमूल्य २१,००० आहे. म्हणजेच जर आपल्याला दररोज २१००० रुपयांचा प्राणवायू लागत असेल, तर तो निसर्गाला परत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शालेय जीवनात प्रशालेत पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार झाडे लावण्यास सांगणे, त्यांची देखरेख करण्यास सांगणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर असे संस्कार झाले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्याबाबत गुणात्मक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे तसेच विदेशी झाडे (उदा. मन्जीयम, रेनट्री, नीलगिरी, सुबामुळ, ग्लिरिसीरिडिया, कासमास, सिल्व्हर ओक, काशीद आदी) लावण्यापासून परावृत्त करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक झाडे प्रत्येकाने लावली पाहिजेत. वड, जांभूळ, निम, शिसम अशा विविध झाडांची लागवड करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.