शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

कडाक्याच्या थंडीतही अभियंत्याचे उपोषण सुरुच

By admin | Updated: January 29, 2015 23:40 IST

जिल्हा प्रशासनाकडून चौथ्या दिवशीही दखल नाहीच

रत्नागिरी : सेवेतून बेकायदेशीररित्या कमी केल्याने न्याय मिळावा, यासाठी देवरूख येथील अभियंता राजेंद्र चव्हाण यांचे कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरूच आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन मात्र, या उपोषणाबाबत बेदखल असल्याचे दाखवत आहे.देवरूख येथील राजेंद्र धर्माजी चव्हाण यांना मुदतीत शैक्षणिक अर्हता संपादन केली नसल्याच्या कारणावरून १९८८ च्या सुमारास जिल्हा परिषदेकडून अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. याबाबत त्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरीही उमेद न घालवता चव्हाण यांनी कधी पत्रव्यवहार, अर्ज -विनंत्या तर कधी उपोषण करून दाद मिळविण्याचा प्रयत्न केला.याबाबत आठ महिन्यापुर्वीच शासनाने नवीन अध्यादेश काढला. त्यानुसार अशा व्यक्तींना सेवेतून कमी न करता त्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, असे नमूद करण्यात आले होते. अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेलाही पाठविण्यात आले होते. त्यानंतरही चव्हाण यांना दिलासा वाटल्याने त्यांनी पुन्हा सातत्याने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाचा आडमुठेपणा कायम राहिला, असे उपोषणकर्त्या चव्हाणांचे म्हणणे आहे.सेवेतून कमी करण्यात आल्याने सुमारे २७ वर्षे चव्हाण यांना बेरोजगारीचा व इतर अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अद्याप त्यांना जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे नोकरीपासून वंचित राहवे लागले आहे. २६ जानेवारीपासून अभियंता चव्हाण यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे. कडाक्याच्या थंडीतही ते उपोषणाच्या ठिकाणी दिवसरात्र असूनही, याची दखल जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घ्यावीशी वाटत नाही. याबाबत आपल्याला न्याय मिळाला नाहीच तर आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे राजेंद्र धर्माजी चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)