शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

घोटगे बससेवेसाठी नियंत्रकांना घेराओ

By admin | Updated: September 16, 2015 00:42 IST

एकनाथ नाडकर्णींचे आश्वासन : मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

कसई दोडामार्ग : घोटगे परमे सुरू झालेली एसटी बस बंद केल्याने मंगळवारी घोटगे ग्रामस्थांनी दोडामार्ग वाहतूक नियंत्रक यांना घेराओ घालून ही बस पूर्ववत सुरू ठेवा, अशी मागणी केली. तात्पुरती गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत न ठेवता कायमस्वरूपी ठेवा. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ही एसटी बस कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून प्रयत्न केले जातील, असे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. घोटगे परमे अशी दोडामार्ग येथून एसटी बस सुरू होती. ही बस फेरी पावसाळा सोडला तर इतर महिने सुरू ठेवण्यात आली होती. पावसाळ्यात उद्भवणारी समस्या म्हणजे घोटगे-परमे तिलारी नदीवर पक्का पूल नसल्याने ही बसफेरी पावसाळ्यात बंद ठेवली जायची. मात्र, गेल्यावर्षी दिवाळीनंतर पक्के पूल बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली, या पावसाळ््यात पुलाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे एसटी महामंडळाने ही बसफेरी पूर्ववत सुरू ठेवणे गरजेचे असताना, अद्यापपर्यंत ही बस सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना वाहतुकीच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. गणेश चतुर्थी सणापूर्वी ही बस फेरी सुरू करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत बऱ्याच दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने तसेच प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली होती. मात्र, एसटी महामंडळाने या मागणीकडे लक्ष दिला नाही. या कारणाने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला. या मागणीकडे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनीही तसा पत्रव्यवहार संबंधित अधिकाऱ्यांना केला. त्याला प्रत्युत्तरही अधिकाऱ्यांनी नाडकर्णी यांना दिले. गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत ही बसफेरी सुरू ठेवतो, असे कळविले. हे ग्रामस्थांनी मान्य न करता कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याने मंगळवारी घोटगे ग्रामस्थांनी दोडामार्ग एसटी बस नियंत्रण कक्षाचे वाहतूक नियंत्रकांना घेराव घातला. ही बसफेरी अद्याप सुरू का करण्यात आली नाही, याचा जाब विचारला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी उपस्थित होते. रस्त्याच्या कडेला असलेली झाडी न तोडल्याने वाहतुकीला अडथळा येत असल्याने सुरू केली नाही, असे वाहतूक नियंत्रकांनी सांगताच ही झाडी तोडून कित्येक दिवस झाले. मात्र, ही बसफेरी का सुरू केली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली. ही एसटी बस गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीपुरती सुरू न ठेवता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी. अन्यथा आम्हाला आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल, असे ग्रामस्थांनी सांगितले. गणेश चतुर्थीनंतर ही एसटी बसफेरी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही बस कामयस्वरूपी सुरू ठेवणार, असे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थ विठ्ठल दळवी, भरत दळवी, कानू दळवी, सतीश परब, शंकर दळवी, संजय दळवी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)