शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

रोजगार हमीतून पाणंदी झाल्या प्रशस्त

By admin | Updated: February 4, 2015 23:57 IST

बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळावा व त्यातूनच गावचा विकास व्हावा, या उद्देशाने सोनाळीत ‘रोहयो’ची कामे सुरू आहेत

बोरवडे : कागल तालुक्यातील डोंगररांगामध्ये वसलेल्या सोनाळी गावामध्ये शासनाची रोजगार हमी योजना गावकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. शेतमजूर भूमिहीन कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत घेत आहेत. यातून गावातील पूर्वीपासून झाडाझुडपांच्या गर्दीत गडप झालेले पाणंद रस्ते प्रशस्त झाले आहेत. गावचा चेहरामोहराच यामुळे बदलला आहे.‘हाक शासनाची, हमी रोजगाराची’ या शासनाच्या घोषवाक्याचा हेतू सोनाळीमध्ये सफल होताना दिसत आहे. बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळावा व त्यातूनच गावचा विकास व्हावा, या उद्देशाने सोनाळीत ‘रोहयो’ची कामे सुरू आहेत.सोनाळी गावामध्ये रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवीत गेल्या तीन वर्षांपासून पाणंद रस्त्यांची कामे मजुरांकडूनच पारदर्शकपणे सुरू आहेत. रोजगार हमीकडे काम करणाऱ्या लोकांना प्रतिदिन १४५ ते १६२ रुपये हजेरी मिळते. त्यामुळे काम मिळण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. पाणंद रस्त्यांनी २० ते २५ फुटांचे प्रशस्त रूप धारण केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी सोनाळी गावाला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.रोजगार हमी योजनेत काम केलेल्या मजुरांचे पैसे देण्यास प्रशासनातील उदासीनतेमुळे विलंब झाल्यास स्वत:कडील पैसे मजुरांना देऊन सहकार्य करतो. भूमिहीन कुटुंबांना आपल्या गावातच रोजगार मिळाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. शिवाय गावच्या विकासालाही चालना मिळाली आहे.- सत्यजित पाटील, सरपंच