शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: May 11, 2016 23:55 IST

वनविभाग वाऱ्यावर : सुरक्षेसाठी अपुरी साधने, जीवावर उदार होऊनच कार्य

वैभव साळकर -- दोडामार्ग --तिलारी खोऱ्यात हैदोस घालणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या जंगली हत्तींना पिटाळून लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या सिंधुदुर्गातील वनकर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र रामभरोसे आहे. काही वर्षांपूर्वी कुडाळ येथे एका वनकर्मचाऱ्याचा हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला असतानाही वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत मात्र वनविभाग आणि राज्यशासन अद्याप गंभीर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या वनकर्मचाऱ्यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे.सिंधुदुर्गात गेल्या पंधरा वर्षांपासून जंगली हत्तींचे संकट आहे. प्रामुख्याने दोडामार्ग तालुक्याला लागलेले हे ग्रहण अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे वनकर्मचारी आणि शेतकरीही हत्तीसंकटामुळे हैराण झाले आहेत. फेब्रुवारी सन २००२ मध्ये सर्वात प्रथम जंगली हत्तींचे आगमन दोडामार्ग तालुक्यात झाले. मांगेली गावात कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी सर्वप्रथम प्रवेश केला आणि त्यानंतर पुढे हत्तींचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीला मांगेलीमधील शेतकऱ्यांनी गजांतलक्ष्मी संबोधून हत्तींच्या पावलांची पूजा केली. मात्र, याच हत्तींनी तेथील शेतकऱ्यांची भातशेती पायदळी तुडवत शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली. हत्तींच्या धास्तीने मांगेलीत आजही शेती करणे शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. दोडामार्गमार्गे गोवा राज्यासहीत जिल्ह्यातील कुडाळ, माणगाव खोरे, कणकवली, मालवण, ओरोस अशी धडक या हत्तींनी मारली. या काळात शेतकऱ्यांची भातशेती, माड, पोफ ळी आणि केळीच्या बागायती पायदळी तुडवत कोट्यवधी रूपयांचे नुकसान शेतकऱ्यांनी केले. हत्तींना आवर घालण्यासाठी शेकडो वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. रात्रीच्यावेळी गस्त घालण्याचे काम हे वनकर्मचारी करायचे. त्यामुळे हत्ती आणि वनकर्मचारी असू जणू समीकरणच तयार झाले. हातात बॅटरी, फटाके आणि अ‍ॅटमबॉम्ब एवढेच साहित्य घेऊन हत्तींना हाकलवून लावण्याची ही मोहीम या वनकर्मचाऱ्यांवर होती. पण सुरक्षेच्या दृष्टीने मात्र कोणतेच साधन नव्हते. अशा परिस्थितीत जंगलात दबा धरून बसलेले हत्ती रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात कधी हल्ला करतील, याची शाश्वती नसायची. त्यामुळे जीव मुठीत धरून दिलेली मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती. गेली दोन वर्षे दोडामार्ग तालुक्यात आणि पर्यायाने तिलारी खोऱ्यात हत्तींची जाग नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा तिलारी खोऱ्यात बाबरवाडी, बिजघर व बोरयेवाडी या परिसरात हत्तींच्या संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दरदिवशी शेती बागायतीचे नुकसान होत असल्याने वनकर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा हत्तींची ‘ड्युटी’ सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेच साधन नसल्याने वनकर्मचारी हतबल आहेत. दोन दिवसांपूर्वीच बाबरवाडी येथे वनकर्मचारी आणि शेतकऱ्यांवर टस्कर हत्तीने हल्ला चढविला. या हल्ल्यात वनकर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे शेतकरी आणि गस्तीवरील कर्मचारी थोडक्यात वाचले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मात्र, या प्रकारामुळे वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.वनकर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी फायबरच्या लाठ्या आणि शिल्ड (ढालसदृश वस्तू) देण्यात आली आहे. मात्र, या वस्तू हत्तीसारख्या महाकाय प्राण्याच्या तुलनेत फारच नगण्य आहेत. त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी काहीच उपयोग नाही. त्यामुळे गस्तीवर असणाऱ्या या वनकर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच काम करावे लागत आहे. एकंदरीत वनकर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र रामभरोसे आणि बेभरवशाची असून, राज्यशासन मात्र अद्याप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्याबाबतीत कानाडोळा करत आहे.