शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

अरबी समुद्रातील निवती रॉक येथील कर्मचारी अद्याप दीपगृहातच

By admin | Updated: September 7, 2014 23:19 IST

निवती रॉकमधील प्रकार : कर्मचाऱ्याच्या हातापायांना सूज

सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यात अरबी समुद्रातील निवती रॉक येथील दीपगृहावर देश संरक्षणासाठी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर गेले सहा दिवस उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी व त्यांना धान्य व औषध पुरवठा करण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने तिन्ही कर्मचाऱ्यांची अवस्था गंभीर बनली आहे. यातील एका कर्मचाऱ्याच्या हाताला व पायाला सूजही आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत या कर्मचाऱ्यांना धान्य व औषध पुरवठा करण्यात आला नव्हता. याबाबत माहिती अशी की, देश संरक्षणासाठी अरबी समुद्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या किनाऱ्यावर दीपगृह उभारण्यात आले आहेत. तसाच दीपगृह निवती येथे आहे. या दीपगृहात असिस्टंट लाईट किपर ए. एस. सोरस (रा. गोवा), दीप परिचर राजेंद्र वाल्मिकी (रा. जादूमई उत्तरप्रदेश), एस. एम. जाधव (रा. देवरूख-रत्नागिरी) हे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. दर तीन महिन्यांनी येथील कर्मचारी बदलले जातात. त्यांना तीन महिने पुरेल, एवढा धान्य साठा, औषधे दिली जातात. परंतु या कर्मचाऱ्यांचा धान्यसाठा पाच-सहा दिवसांपूर्वीच संपला आहे. तसेच त्यांच्याकडे औषधेही नाहीत. त्यांच्याकडे संपर्कासाठी कोणतेही साधन नाही. यातील एका कर्मचाऱ्याने गेले काही दिवस कुटुंबाशी संपर्क न साधल्याने हा प्रकार उघडकीस आला. मात्र, या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली बोट अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे किंवा त्यांच्यापर्यंत धान्य पुरवठा करणे या दोन्ही गोष्टी शक्य झाल्या नाहीत. दरम्यान, यातील राजेंद्र वाल्मिकी या कर्मचाऱ्याला मधुमेहाचा त्रास असून त्याच्या हातापायांनाही सूज आली आहे. तर ए. एस. सोरस यांना हृदय विकाराचा त्रास आहे. त्यामुळे बंदर विभागाने या कर्मचाऱ्यांना शक्य तेवढे लवकर तेथून बाहेर काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांची प्रकृती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. स्थानिक रहिवासी आबा कोचरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी असा कोणताही प्रकार घडला नव्हता. हा पहिल्यांदाच प्रकार घडत आहे. अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना धान्य पोहोचविले गेले नाही. समुद्र खवळला असल्याने समुद्रात बोट घालणेही शक्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी बंदर विभागाने हॅलिकॉप्टरची सोय करणे गरजेचे आहे. पण अद्यापपर्यंत अशी कोणतीही सोय केली नसल्याचे आबा कोचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)