शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

अरबी समुद्रातील निवती रॉक येथील कर्मचारी अद्याप दीपगृहातच

By admin | Updated: September 7, 2014 23:19 IST

निवती रॉकमधील प्रकार : कर्मचाऱ्याच्या हातापायांना सूज

सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यात अरबी समुद्रातील निवती रॉक येथील दीपगृहावर देश संरक्षणासाठी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर गेले सहा दिवस उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी व त्यांना धान्य व औषध पुरवठा करण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने तिन्ही कर्मचाऱ्यांची अवस्था गंभीर बनली आहे. यातील एका कर्मचाऱ्याच्या हाताला व पायाला सूजही आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत या कर्मचाऱ्यांना धान्य व औषध पुरवठा करण्यात आला नव्हता. याबाबत माहिती अशी की, देश संरक्षणासाठी अरबी समुद्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या किनाऱ्यावर दीपगृह उभारण्यात आले आहेत. तसाच दीपगृह निवती येथे आहे. या दीपगृहात असिस्टंट लाईट किपर ए. एस. सोरस (रा. गोवा), दीप परिचर राजेंद्र वाल्मिकी (रा. जादूमई उत्तरप्रदेश), एस. एम. जाधव (रा. देवरूख-रत्नागिरी) हे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. दर तीन महिन्यांनी येथील कर्मचारी बदलले जातात. त्यांना तीन महिने पुरेल, एवढा धान्य साठा, औषधे दिली जातात. परंतु या कर्मचाऱ्यांचा धान्यसाठा पाच-सहा दिवसांपूर्वीच संपला आहे. तसेच त्यांच्याकडे औषधेही नाहीत. त्यांच्याकडे संपर्कासाठी कोणतेही साधन नाही. यातील एका कर्मचाऱ्याने गेले काही दिवस कुटुंबाशी संपर्क न साधल्याने हा प्रकार उघडकीस आला. मात्र, या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली बोट अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे किंवा त्यांच्यापर्यंत धान्य पुरवठा करणे या दोन्ही गोष्टी शक्य झाल्या नाहीत. दरम्यान, यातील राजेंद्र वाल्मिकी या कर्मचाऱ्याला मधुमेहाचा त्रास असून त्याच्या हातापायांनाही सूज आली आहे. तर ए. एस. सोरस यांना हृदय विकाराचा त्रास आहे. त्यामुळे बंदर विभागाने या कर्मचाऱ्यांना शक्य तेवढे लवकर तेथून बाहेर काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांची प्रकृती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. स्थानिक रहिवासी आबा कोचरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी असा कोणताही प्रकार घडला नव्हता. हा पहिल्यांदाच प्रकार घडत आहे. अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना धान्य पोहोचविले गेले नाही. समुद्र खवळला असल्याने समुद्रात बोट घालणेही शक्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी बंदर विभागाने हॅलिकॉप्टरची सोय करणे गरजेचे आहे. पण अद्यापपर्यंत अशी कोणतीही सोय केली नसल्याचे आबा कोचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)