शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

वाढत्या वीज समस्यांसाठी कर्मचाऱ्यांची गरज

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

बांदा परिसरातील स्थिती : शहर मर्यादेच्या तुलनेत कर्मचारी कमी; २४ तास सेवा देऊनही अधिकाऱ्यांचे प्रयत्न ठरताहेत निष्फळ

नीलेश मोरजकर --बांदा शहर व परिसरात गेल्या महिनाभरात वीज अचानक गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे येथील वीज ग्राहक हे त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागातील २३ गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 वीज जोडण्या आहेत. येथील विजेच्या समस्या या वाढत्याच असून, त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी असल्याने या समस्यांचे तातडीने निराकरण करणे हे अशक्यप्राय होते. परिणामी ग्राहकांचा नाराजीला बांद्यातील अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. बांदा हे ग्रामीण भागात येत असल्याने येथे काम करण्यासाठी मर्यादा येत आहेत. अशा स्थितीतही येथे नव्यानेच आलेले अधिकारी हे २४ तास सेवा बजावून येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, येथील भौगोलिक परिस्थिती, जंगल भागातून गेलेल्या लाईन या काम करण्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत.बांदा शहर व परिसरातील गावांमध्ये विजेच्या समस्या या गंभीर असून, याबाबत ग्राहकांचा मोठा रोष आहे. यामुळे गेल्या काही कालावधीत वीज ग्राहकांकडून येथील अधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा, विद्युत खांब यामुळे विजेच्या समस्या या वाढत्याच आहेत.वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागीय कार्यालयात दोन विभाग आहेत. बांदा १ मध्ये बांदा शहर, डेगवे, वाफोली, नेतर्डे, विलवडे, भालावल, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, शेर्ले ही गावे येतात. या विभागासाठी सहायक अभियंता म्हणून सुभाष आपटेकर कार्यरत आहेत. बांदा २ मध्ये असनिये, आरोस, तांबोळी, कोनशी, नांगरतास, सरमळे, दाभिल, कास, निगुडे, पाडलोस, मडुरा, इन्सुली, रोणापाल ही गावे येतात. या विभागासाठी कनिष्ठ अभियंता पी. के. आखाडे हे कार्यरत आहेत. या दोन्ही विभागातील गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 घरगुती, व्यावसायिक वीज जोडण्या आहेत.दोन्ही विभागांतील २३ गावांसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काम करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. बांदा एकमध्ये नेतर्डे, गाळेल, डिंगणे, डोंगरपाल या गावांसाठी, तर बांदा २ मध्ये मडुरा, रोणापाल, दाभिल, सरमळे, कोनशी, तांबोळी या गावांसाठी एकही कर्मचारी नसल्याने येथील वीज ग्राहक हे वाऱ्यावरच आहेत. बांदा २ साठी मुख्य तंत्रज्ञच नसल्याने त्यांना बांदा १ वर अवलंबून रहावे लागते. बांदा शहरामध्ये ६000 वीज जोडण्या आहेत, तर या विभागातील ९ गावांमध्ये सुमारे १५ हजार वीज जोडण्या आहेत. बांदा येथे तक्रारींची संख्याही अधिक आहे. बांदा शहरासह विभागात केवळ १ लाईनमन, १ विद्युत सहायक व २ तंत्रज्ञ आहेत. २१ हजार वीज जोडण्यांसाठी हा अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने या कर्मचाऱ्यांना विजेच्या समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. बांदा शहरात २२५ स्ट्रिटलाईट असून, या दिव्यांची देखभाल दुरुस्तीदेखील करावी लागते.निवेदन देऊनही ‘जैसे थे’ स्थितीबांदा शहरात २५ ट्रान्स्फॉर्मर (वीज जनित्र), तर बांदा विभागात ६0 जनित्रे आहेत. बांदा २ मध्ये ४३ जनित्रे आहेत. या जनित्रांचीदेखील देखभाल व दुरुस्तीची कामे वारंवार करावी लागतात. बांदा येथील नागरीकरणात वाढ होत आहेत. परिणामी वीज ग्राहक झपाट्याने वाढत आहेत. येथील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रात्रीच्या वेळीदेखील वीज गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी बांद्यात रात्रपाळीसाठी २ कर्मचारी द्यावेत असे पत्र सहाय्यक अभियंता आपटेकर यांनी ३0 मे रोजी कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कर्मचारी देण्यात आले नाहीत.