शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वीज समस्यांसाठी कर्मचाऱ्यांची गरज

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

बांदा परिसरातील स्थिती : शहर मर्यादेच्या तुलनेत कर्मचारी कमी; २४ तास सेवा देऊनही अधिकाऱ्यांचे प्रयत्न ठरताहेत निष्फळ

नीलेश मोरजकर --बांदा शहर व परिसरात गेल्या महिनाभरात वीज अचानक गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे येथील वीज ग्राहक हे त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागातील २३ गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 वीज जोडण्या आहेत. येथील विजेच्या समस्या या वाढत्याच असून, त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी असल्याने या समस्यांचे तातडीने निराकरण करणे हे अशक्यप्राय होते. परिणामी ग्राहकांचा नाराजीला बांद्यातील अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. बांदा हे ग्रामीण भागात येत असल्याने येथे काम करण्यासाठी मर्यादा येत आहेत. अशा स्थितीतही येथे नव्यानेच आलेले अधिकारी हे २४ तास सेवा बजावून येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, येथील भौगोलिक परिस्थिती, जंगल भागातून गेलेल्या लाईन या काम करण्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत.बांदा शहर व परिसरातील गावांमध्ये विजेच्या समस्या या गंभीर असून, याबाबत ग्राहकांचा मोठा रोष आहे. यामुळे गेल्या काही कालावधीत वीज ग्राहकांकडून येथील अधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा, विद्युत खांब यामुळे विजेच्या समस्या या वाढत्याच आहेत.वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागीय कार्यालयात दोन विभाग आहेत. बांदा १ मध्ये बांदा शहर, डेगवे, वाफोली, नेतर्डे, विलवडे, भालावल, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, शेर्ले ही गावे येतात. या विभागासाठी सहायक अभियंता म्हणून सुभाष आपटेकर कार्यरत आहेत. बांदा २ मध्ये असनिये, आरोस, तांबोळी, कोनशी, नांगरतास, सरमळे, दाभिल, कास, निगुडे, पाडलोस, मडुरा, इन्सुली, रोणापाल ही गावे येतात. या विभागासाठी कनिष्ठ अभियंता पी. के. आखाडे हे कार्यरत आहेत. या दोन्ही विभागातील गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 घरगुती, व्यावसायिक वीज जोडण्या आहेत.दोन्ही विभागांतील २३ गावांसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काम करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. बांदा एकमध्ये नेतर्डे, गाळेल, डिंगणे, डोंगरपाल या गावांसाठी, तर बांदा २ मध्ये मडुरा, रोणापाल, दाभिल, सरमळे, कोनशी, तांबोळी या गावांसाठी एकही कर्मचारी नसल्याने येथील वीज ग्राहक हे वाऱ्यावरच आहेत. बांदा २ साठी मुख्य तंत्रज्ञच नसल्याने त्यांना बांदा १ वर अवलंबून रहावे लागते. बांदा शहरामध्ये ६000 वीज जोडण्या आहेत, तर या विभागातील ९ गावांमध्ये सुमारे १५ हजार वीज जोडण्या आहेत. बांदा येथे तक्रारींची संख्याही अधिक आहे. बांदा शहरासह विभागात केवळ १ लाईनमन, १ विद्युत सहायक व २ तंत्रज्ञ आहेत. २१ हजार वीज जोडण्यांसाठी हा अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने या कर्मचाऱ्यांना विजेच्या समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. बांदा शहरात २२५ स्ट्रिटलाईट असून, या दिव्यांची देखभाल दुरुस्तीदेखील करावी लागते.निवेदन देऊनही ‘जैसे थे’ स्थितीबांदा शहरात २५ ट्रान्स्फॉर्मर (वीज जनित्र), तर बांदा विभागात ६0 जनित्रे आहेत. बांदा २ मध्ये ४३ जनित्रे आहेत. या जनित्रांचीदेखील देखभाल व दुरुस्तीची कामे वारंवार करावी लागतात. बांदा येथील नागरीकरणात वाढ होत आहेत. परिणामी वीज ग्राहक झपाट्याने वाढत आहेत. येथील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रात्रीच्या वेळीदेखील वीज गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी बांद्यात रात्रपाळीसाठी २ कर्मचारी द्यावेत असे पत्र सहाय्यक अभियंता आपटेकर यांनी ३0 मे रोजी कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कर्मचारी देण्यात आले नाहीत.