शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
3
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
4
“पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
5
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
6
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
7
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
8
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
9
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
10
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
11
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
12
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
13
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
14
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
15
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
16
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
17
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
18
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
19
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
20
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...

अपहार व्यवस्थापिकेकडूनच

By admin | Updated: August 29, 2015 00:20 IST

अध्यक्षांची कबुली : देवरुखातील ओंकार सहकारी पतसंस्थेतील प्रकरण

देवरुख : ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत घोटाळा झाला असल्याची कबुली आज शुक्रवारी संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत दिली. हा घोटाळा नेमका किती कोटींचा आहे याची उकल लेखा परीक्षणानंतर होईल. या साऱ्या प्रकरणात व्यवस्थापिका वासंती निकम यांचाच हात असल्याचे सकृ तदर्शनी दिसून येत असल्याची स्पष्ट माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी यांनी दिली.देवरुखमधील एका प्रसिद्ध व सातत्याने आॅडिट ‘अ’ वर्गात असणाऱ्या एका पतसंस्थेत ‘कोटींची’ अफरातफर झाल्याच्या चर्चांना एकच ऊत आला होता. त्या चर्चांना आता शुक्रवारी संचालक मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्णविराम मिळाला आहे. ही पत्रकार परिषद पतसंस्थेच्या कार्यालयात दुपारी १२.३० वाजता घेण्यात आली. या घोटाळ्यामध्ये संचालक मंडळाचा कोणत्याच प्रकारचा सहभाग नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला.पतसंस्थेतील झालेल्या कर्ज व्यवहारावर संचालक मंडळाने नजर टाकली असता ठेवीवरच अधिक कर्ज घेतल्याचे दिसून आले आणि यावेळी याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला असता ठेवींचे खोटे अकाऊंट दाखवून हा बनाव व्यवस्थापिकेने केला असल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली. कोटींच्या घरामध्ये हा आकडा असल्याच्या प्राथमिक अंदाजावरून संचालक मंडळाची एकच धावपळ झाली. संचालकांनी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या प्रकरणाबाबतची आपली भूमिका जाहीर केली आहे.

व्यवस्थापिकेची कबुलीकाही संचालक आणि संचालक मंडळाचे वकील यांच्यासमोर व्यवस्थापिका वासंती निकम यांनी या घोटाळ्याची तोंडी कबुली दिली असल्याचेही शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत संचालकांकडून सांगण्यात आले. यावेळी बोलताना जोशी म्हणाले की, या घोटाळ्यामध्ये अन्य कोणाचा हात आहे किंवा या प्रकरणाविषयी काही सांगण्यासाठी कोणाचा दबाव येत आहे का? याबाबतही निकम यांच्याशी बोलणे झाले आहे.रक्कम परत करूझालेल्या अफरातफरीची तोंडी कबुली देत आपण घोटाळ्यातून घेतलेली रक्कम परत करू, असे तोंडी आश्वासन वासंती निकम यांनी दिले आहे. त्यांनी १५ दिवसांची मुदतही मागितली आहे, असेही संचालकांनी सांगितले.घोटाळ्याचा आकडा लवकरचपतसंस्थेत झालेला घोटाळा नेमका किती रकमेचा आहे, हे लेखा परीक्षणानंतरच समजेल. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याशी चर्चा करून सहकार बोर्डाच्या पॅनेलवरील लेखा परीक्षकांकडून हे परीक्षण केले जात आहे. तोपर्यंत खात्रीपूर्वक किती रुपयांचा कोटींचा घोटाळा झाला आहे, हे सांगता येणार नाही, असे संस्थाध्यक्ष राजाराम जोशी यांनी सांगितले.