शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

किनळोस येथे हत्तींची वस्तीवर चाल

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

शेती-बागायतीचेही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

कडावल : किनळोस बागवेवाडी येथे मंगळवारी रात्री दोन हत्ती भरवस्तीत घुसल्यामुळे खळबळ माजली. येथील शेती- बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सातत्याने नुकसान करणाऱ्या हत्तींचा वन विभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. किनळोस-बागवेवाडी येथे काल रात्री दोन रानटी हत्ती भरवस्तीत दाखल झाल्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. येथील शेती-बागायतीचेही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वन कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून हत्तींना वस्तीपासून दूर हाकलण्यात यश मिळविले असले, तरी तोपर्यंत शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काल रात्री रामचंद्र बागवे यांच्या अंगणात हत्ती प्रथम दाखल झाले. त्यांनी आपल्या घराच्या पुढील पडवीत नाचणीची कणसे वाळत टाकली होती. हत्तींनी यातील काही कणसे फस्त केली. हत्तींची चाहूल लागताच घरातील माणसांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा घराच्या मागील भागाकडे वळविला. तेथे असलेल्या माड बागायतीमधील सुमारे २० माड जमीनदोस्त केले. येथील शेतकरी पंढरीनाथ बागवे यांच्या केळींचे व भातशेतीचेही या हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती येथील शेती-बागायतीचे नुकसान करत असताना ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दूरध्वनीवरून दिली होती. काही वेळातच वनकर्मचारी देसाई व त्यांचे प्रथम मानवी वस्तीपासून दूर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वनकर्मचारी व ग्रामस्थांनी संयुक्तपणे हत्ती हटाव मोहीम राबविंली. फटाके व डबे वाजवून हत्तींना वस्तीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्तींना वाडीतून बाहेर काढण्यासाठी निकराचे प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच वेळानंतर दोन्ही हत्ती वस्तीमधून बाहेर पडून बोभाटा भागाच्या दिशेने मार्गस्थ झाले. हत्ती हटाव मोहिमेत वनकर्मचाऱ्यांबरोबर शिवराम राणे, अनंत बागवे, सुरेश बागवे, दिवाकर बागवे, एकनाथ साटम, नरेश बागवे, श्रीकृष्ण बागवे, आदेश बागवे, सत्यम बागवे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, वन्य प्राण्यांकडून शेतीबागायतीचे सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. रानटी हत्तींपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वनविभागाने हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)