शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींचे धुमशान सुरुच

By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST

वैभववाडी तालुक्यात नुकसान : शेतकरी भयभीत

वैभववाडी : आचिर्णे घाणेगड येथील मुक्काम हलवून दोन रानटी हत्ती खांबाळे, एडगांवमार्गे कुंभवडेच्या जंगलाकडे सरकले आहेत. या प्रवासात त्यांनी ३ गावातील ८ शेतकऱ्यांचे माड, केळी व ऊसशेतीचे नुकसान करीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आचिर्णे मधलीवाडीतील श्रीधर मारुती रावराणे यांच्या घराचा दरवाजा हत्तीने तोडला. पहिल्यांदाच आचिर्णेची हद्द ओलांडून हत्ती पुढे कुंभवडेकडे सरकल्यामुळे खांबाळे, वाभवे, एडगांव परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.वैभववाडी तालुक्यात दुसऱ्यांदा रानटी हत्तींनी एन्ट्री केली. शुक्रवारी रात्री आचिर्णे घाणेगडवाडीत मुक्काम केल्यानंतर शनिवारी त्यांनी खांबाळे खालच्यावाडीत रात्री ११.३० वाजता हजेरी लावली. तेथून वाभवेमार्गे एडगाव पवारवाडी, फौजदारवाडीतून माड व केळींची नासधूस करत पहाटे ५ च्या सुमारास हत्तींनी कुंभवडेच्या जंगलाचा मार्ग धरला. हत्ती आल्याची माहिती मिळताच खांबाळे व एडगावमध्ये धांदल उडाली.१२ किलोमीटर प्रवासआचिर्णे घाणेगडचे जंगल ते कुंभवडे या १२ किलोमीटरच्या प्रवासात दोन रानटी हत्तींनी आचिर्णेतील महेश आत्माराम रावराणे यांची ऊसशेती, खांबाळेतील परशुराम मोहिते, अनंत वळंजू, जयसिंग मोहिते यांचे माड व केळी, एडगाव येथील रवींद्र रावराणे यांचे माड व केळी तर विश्वनाथ रावराणे यांची केळीची बाग जमीनदोस्त केली. तसेच खांबाळे मोहितेवाडीतील शिवाजी पवार यांच्या घरातील भाताच्या गोणीची नासधूस केली. एका रात्रीत ८ शेतकऱ्यांच्या ऊसशेतीसह माड, केळींचे नुकसान केल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. कुंभवडेत घनदाट जंगल आहे. त्यामुळे याठिकाणी हत्ती स्थिरावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हत्तींनी कुंभवडेतून मुक्काम हलविला तर पुढे कुंभारी तिरवडेमार्गे भुईबावडा-ऐनारीकडे सरकण्याची शक्यता आहे किंवा सोनाळीतून कुसूर नापणे असा प्रवास त्यांनी सुरु केल्यास ऊस शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)दरवाजावरील धडकेने उडवला थरकापखांबाळेत दाखल होण्यापूर्वी शनिवारी रात्री ११ वाजता एका हत्तीने आचिर्णे मधलीवाडीतील श्रीधर मारुती रावराणे यांच्या घराचा पुढचा दरवाजा धडक मारुन तोडला. त्यावेळी ओट्यावर झोपलेली मुले, माणसे खडबडून जागी झाली. त्यांनी घरातील लाईट लावताच दरवाजातून आत आलेली सोंड पाहून १४ वर्षांचा त्यांचा मुलगा बेशुद्ध पडला. त्यामुळे सारेच गोंधळले. मात्र, लाईट लागताच हत्तीने पुढचा मार्ग धरल्यामुळे अनर्थ टळला.दुसऱ्यांदा तालुक्यात दाखल झालेल्या हत्तींनी दुसऱ्या रात्री तीन गावात नुकसान करून कुंभवडेकडे मार्गक्रमण केल्यामुळे वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील, वनपाल सावंत व २५ वनरक्षकांचे पथक हत्तींच्या मागावर आहेत.