शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

एका महिन्यात भरली गेली तब्बल पावणेतीन कोटींची वीजबिले

By admin | Updated: November 14, 2014 23:17 IST

महावितरणला २ कोटी ८७ लाख ७३ हजार २४९ रूपयांचा महसूल

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी -तासन्तास रांगेत उभे राहून वीजबिल भरण्यापेक्षा तातडीने भरता यावे, यासाठी स्वयंचलित वीजबिल केंद्र सुरू करण्यात आली. २४ तास वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरणने कोकण झोनमध्ये पाच एटीपी केंद्र सुरू केली आहेत. या पाचही केंद्रात अवघ्या एका महिन्यात २४ हजार ७८३ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे महावितरणला २ कोटी ८७ लाख ७३ हजार २४९ रूपयांचा महसूल मिळाला आहे.आॅक्टोबर महिन्यात रत्नागिरी विभागातील १६ हजार ५६० ग्राहकांनी २ कोटी २९ लाख ४५ हजार ७७७ रूपये एटीपी केंद्रात भरले आहेत. सप्टेंबर महिन्यात १६ हजार २०५ ग्राहकांनी याचा लाभ घेतला होता. त्यामुळे १ कोटी ९२ लाख ८३ हजार ४१५ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार २२३ ग्राहकांनी एटीपी केंद्रात ५८ लाख २७ हजार ४७२ रूपये भरले होते. सप्टेंबरमध्ये ८ हजार ९३६ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ६९ लाख ७३ हजार ३२६ रूपये भरण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यातील रत्नागिरी विभागाचे उत्पन्न कमी होते, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पन्न वाढल्याचे दिसून येत आहे.रत्नागिरी शहरात नाचणे येथे सुरू असलेल्या एटीपी केंद्राला देवरूख, रत्नागिरी ग्रामीण १ व २, राजापूर १ व २, रत्नागिरी शहर, राजापूर, लांजा, संगमेश्वर विभाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे शहरात अन्य कामकाजासाठी आलेल्या ग्राहकाना एटीपी केंद्राव्दारे बिल भरणे सोपे होते. रत्नागिरी केंद्रामध्ये ११ हजार ४२७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे १ कोटी ८१ लाख ६ हजार ८७७ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. चिपळूण केंद्रामध्ये चिपळूण शहर व ग्रामीण, सावर्डे, गुहागर हा विभाग जोडण्यात आला आहे. चिपळूण विभागातील ४२०७ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ३८ लाख २८ हजार ८९० रूपये प्राप्त झाले आहेत. खेड केंद्राला खेड, लोटे, दापोली १ व २ जोडले आहेत. ९२६ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्यामुळे १० लाख १० हजार १० रूपये प्राप्त झाले आहेत.कणकवली विभागातून ५ हजार २३५ ग्राहकांनी ३६ लाख ७० हजार ६४२ रूपये, मालवण विभागातून २ हजार ९८८ ग्राहकांनी २१ लाख ५६ हजार ८३० रूपयांचा महसूल भरला आहे. एटीपी केंद्रामुळे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. तासनतास रांगेत तिष्ठत उभे राहण्यापेक्षा लवकर व सुटीच्या दिवशीही बिल भरणे शक्य होत आहे.ग्राहकांचा वेळ वाचतो. तसेच सुटीच्या दिवशी वीजबिल भरणे सुकर होत असल्यामुळे एटीपी केंद्राकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ग्राहकांच्या हितार्थ रत्नागिरी शहरातील रहाटाघर येथे आणखी एक एटीपी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना वीजबिल भरणे सोपे होईल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व सावंतवाडी येथेही स्वतंत्र दोन स्वयंचलित वीजबिल केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.- एस. टी. नागटिळक, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.