शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:23 IST

कणकवली : जिल्ह्यातील ४२९ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १४ आॅक्टोबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे मतदान १४ आॅक्टोबरला; आचारसंहिता सुरू, सर्वच राजकीय पक्ष लागले तयारीला

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : जिल्ह्यातील ४२९ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १४ आॅक्टोबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यासाठीची आचारसंहिता शुक्रवार (दि. १ सप्टेंबर) पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत मिळणार असून सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळात दिनांक २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने गावागावांतील चांगला चेहरा समोर आणण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ३२५, तर जानेवारी २०१८ मध्ये मुदत संपणाºया १५ ग्रामपंचायती आहेत. सध्या डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ३२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम आणि निवडणुकीसाठीची आचारसंहिता अंमलबजावणी शुक्रवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू केली आहे.मोर्चेबांधणीला वेगजिल्ह्यातील एकूण ४२९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३२५ एवढ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १४ आॅक्टोबर रोजी होत आहेत. यासाठीची आचारसंहिताही संबंधित ग्रामपंचायत परिसरात लागू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात राहाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडायचा असल्याने सरपंच पदासाठी योग्य अशा उमेदवाराचा शोध सर्वच पक्षांना घ्यावा लागणार आहे.निवडणूक कार्यक्रम१४ सप्टेंबरला तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक २२ ते २९ सप्टेंबर, अर्जांची छाननी ३ आॅक्टोबर सकाळी ११ वाजल्यापासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक ५ आॅक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत, अंतिम निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी जाहीर करणे व निवडणूक चिन्ह देणे ५ आॅक्टोबर दुपारी ३ वाजल्यानंतर, मतदान १४ आॅक्टोबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत, मतमोजणी १६ आॅक्टोबर आणि निवडणूक निकाल जाहीर करण्याचा अंतिम दिनांक १७ आॅक्टोबर असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.तालुकानिहाय निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीवेंगुर्ला तालुक्यात २३, कुडाळ ५४, सावंतवाडी ५२, दोडामार्ग २८, वैभववाडी १७, कणकवली ५८, देवगड ३८, मालवण ५५ अशा ३२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.