शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

ऐंशी लाखांच्या लुटीचा पर्दाफाश होऊनही गूढ !

By admin | Updated: March 29, 2016 00:33 IST

प्रश्न अनुत्तरीत: चौथ्या आरोपीला आज रत्नागिरीत आणणार!

रत्नागिरी : ओखा - एर्नाकुलम एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोघांना ८० लाखांना लुटल्यानंतर त्या प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांच्या काळात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम रेल्वेतून सहजपणे नेण्याच्या या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. झवेरी बाजारात सोन्याचे व्यवहार याच पध्दतीने केले जातात काय, बॅँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार का झाला नाही, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. तसेच हा एकूणच लुटीचा प्रकार संगनमताने घडला होता का, याबाबतही गूढ निर्माण झाले आहे. २२ मार्चला पहाटे मुुंबईहून एर्नाकुलमला चाललेली ओखा एक्सप्रेस पहाटे ३.३० वाजता रत्नागिरी स्थानकात आली. त्यानंतर दोघेजण या गाडीच्या एस-७ बोगीत आले. केरळला जाणाऱ्या श्रीराम शेडगे व विकास शिंदे यांना त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत तुम्ही सामान्य श्रेणीचे तिकीट काढून आरक्षित बोगीत कसे बसलात, तुम्हाला साहेबांना भेटावे लागेल, असे सांगून रेल्वेतून उतरविले. त्यानंतर त्यांच्या स्वीफ्ट गाडीतून त्यांना काही अंतरावर नेऊन त्यांच्याकडील ८० लाखांची रक्कम लुटून ते पसार झाले. हा सर्व प्रकार नाट्यमयच होता. केरळमधील जितेंद्र हिंदुराव पवार व सरगर यांच्या सुवर्णपेढीत काम करणारे हे दोन्ही कामगार सोन्याची लगड विकून त्याचे आलेले ८० लाख रुपये केरळला घेऊन जात आहेत, हे ज्या दुकानात सोने विकले तेथील लोकांव्यतिरिक्त अन्य कोणाला माहिती असणे शक्य नव्हते. तेथील कामगार पहिला आरोपी निघाला. त्यातून गुन्ह्याचे धागेदोरे उलगडत गेले. गुन्हा अन्वेषण शाखेने तिघांना अटक करून ६९ लाख ९७ हजार ५०० रुपये हस्तगत केले. परंतु या प्रकरणात जसे कट रचणारे आरोपी आहेत तसेच हे पैसे घेऊन जाणारे दोघेजण ज्वेलर्स मालकांशी खरोखर प्रामाणिक होते काय, त्यांचा या कटाशी काही संबंध तर नाही ना, याचीही खातरजमा होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)तपास सुरूच : आणखी काही संशयित सापडण्याची शक्यता...ऐंशी लाखांच्या लुटीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणातील चौथा आरोपीही रत्नागिरी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतला असून, त्याला मंगळवारी रत्नागिरीत आणले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अत्यंत नियोजनबध्दतेने ऐंशी लाखांची लूट करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात झालेल्या अन्य गुन्ह्यांशीही या आरोपींचा संबंध आहे का, एखादी टोळीच कार्यरत आहे काय, यादृष्टीनेही पोलिसांकडून तपासकाम सुरू आहे. पोलिसांचे अभिनंदन..रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील व त्यांच्या सहकारी पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांच्या काळात दोन गुन्ह्यांचा छडा लावला आहे. पालीत ११ लाखांचे बेकायदा मद्य पकडले व आता लुटीचा पर्दाफाश केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.