शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

जयानंद मठकरांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील: दीपक केसरकर

By admin | Updated: April 20, 2017 16:55 IST

सावंतवाडीत मठकरांची पुण्यतिथि साजरी; मधु मंगेश कर्णिकांना मठकर स्मृती पुरस्कार

आॅनलाईन लोकमतसावंतवाडी, दि. २0 : जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाचा लवकरच भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सर्व आवश्यक तांत्रिक मुद्दे पूर्ण झाल्याचे सांगत कै. जयानंद मठकर यांनी शेवटपर्यंत पत्रकारिता सुरू ठेवत अनेक विषयांना वाचा फोडण्याचे काम केले. तेच काम आजचे पत्रकार करत आहेत. भविष्यात मठकरांचे स्मारक उभे रहावे, अशी इच्छा व्यक्त करत त्यासाठी प्रयत्नही करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी येथे दिली. ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक वैनतेयचे माजी संपादक कै. जयानंद मठकर यांच्या प्रथम स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रीराम वाचन मंदिर व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते.यावेळी कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर ह्यवैनतेयकारह्ण जयानंद मठकर पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक नेवगी, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, गणेश जेठे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, मिलिंद मठकर, अ?ॅड. संदीप निंबाळकर, संजू शिरोडकर, बाळासाहेब बोर्डेकर, डॉ. जी. ए. बुवा, सखी पवार, प्रा. अरूण पणदूरकर, शशिकांत नेवगी, प्रा. मिलिंद भोसले आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना मधु मंगेश कर्णिक म्हणाले, मानवी जीवनाचे प्रश्न पुन्हा मान वर करत आहेत. यासाठी लेखकाने वास्तववादी लेखनाकडे वळण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्रातील पत्रकारिता ही पुरोगामी मानली जाते. टिळकांची पत्रकारिता ज्वलंत होती, तर आगरकरांची पत्रकारिता सौम्य होती. मात्र, स्वातंत्र्य मिळविणे हे दोघांचे एकच ध्येय होते. हीच पत्रकारिता आताच्या पत्रकारांनी पुढे चालविली पाहिजे, असे कर्णिक म्हणाले. प्रास्ताविकात प्रा. प्रवीण बांदेकर यांनी वि. स. खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना मिळावा, असा आशावाद व्यक्त करत त्यांच्या साहित्यातील योगदानाबाबतची माहिती दिली. पत्रकार संघाच्या उपक्रमांची माहिती सदस्य संतोष सावंत यांनी दिली. सूत्रसंचालन सुमेधा नाईक-धुरी यांनी केले. (वार्ताहर)वास्तव साहित्यासाठी मरणाचीही तयारी ठेवा...सद्यस्थितीचे वातावरण अजूनही अस्थिर असून साहित्यिकांनी सत्यासाठी अविरत प्रयत्नरत राहण्याची गरज आहे, त्यासाठी वास्तववादी लेखन हीच काळाची गरज आहे. त्यामुळे साहित्यिकांनी अशा साहित्य निर्मितीसाठी जगायची आणि मरायची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला मंधु मंगेश कर्णिक यांनी साहित्यिकांना दिला.