शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

शैक्षणिक प्रक्रिया ठप्प

By admin | Updated: December 2, 2014 00:30 IST

महेंद्र नाटेकर : संस्थाचालकांच्या सभेत आरोप

कणकवली : इंग्रजी शिक्षणाचे स्तोम माजवल्यामुळे शैक्षणिक प्रक्रिया ठप्प झाली आहे. विनाअनुदान तत्त्वामुळे भ्रष्टाचार बोकाळला असून गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर फेकला जात आहे. शाळा अंतर्गत २० टक्के गुणदान योजनेमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक अराजक माजले असून त्याला बेजबाबदार राज्यकर्तेच जबाबदार आहेत, अशी टीका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी केली आहे.जांभवडे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक, पालक व संस्थाचालकांची नुकतीच सभा आयोजित केली होती. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुभाष मडव होते. प्रा. नाटेकर म्हणाले, शिक्षण देणे म्हणजे सुसंस्कार करणे, मातृभाषेतून दिलेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या हृदयाला भिडते. मुलांच्या मनावर सुसंस्कार होतात. त्यांच्यातील सुप्तगुण विकसीत होऊन विविधांगी व्यक्तिमत्त्व खुलते. शिक्षणातून माणूस घडविला जातो. नाटेकर म्हणाले, विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी परीक्षा रद्द करणे, शिक्षणावरील खर्च वाया जाऊ नये म्हणून तसेच शैक्षणिक दर्जा उंचवावा म्हणून प्रत्येक विषयात प्रत्येक विद्यार्थ्याला २० टक्के गुण देणे हे अशैक्षणिक व अडाणीपणाचे निदर्शक आहे. शिक्षकेतर अनुदान दिले जात होते म्हणून विशेषत: आर्थिक मागासलेल्या कोकणातही हायस्कूल, महाविद्यालयेही सुरू झाली. परंतु ते अनुदान मायबाप सरकारने बंद केल्याने संस्थाचालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करता येत नाही. त्यामुळे ही शैक्षणिक दर्जा खालावत आहे. शैक्षणिक अराजक मोडून काढून उच्च शैक्षणिक दर्जा निर्माण करायचा असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून मराठी माध्यमाच्या शाळांतून इंग्रजी विषय शिकवा. राष्ट्राचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून असल्याने लहरी राजकारण्यांवर अवलंबून शिक्षण खाते न ठेवता स्वायत्त शिक्षण तज्ज्ञांच्या मंडळाकडे सुपूर्द करा. बेजबाबदार राज्यकर्त्यांच्या हाती शिक्षण म्हणजे माकडाच्या हाती कोलीतच दिल्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला. सुभाष मडव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्राचार्य वागरे यांनी केले. (प्रतिनिधी)जनता फार काळ सहन करणार नाहीज्ञानविज्ञानासाठी जागतिक भाषा म्हणून मराठी माध्यमांच्या शाळांतून अनिवार्य भाषा म्हणून इंग्रजी अध्ययन- अध्यापन झाले पाहिजे. मात्र मातृभाषेचे स्थान इंंग्रजी घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना आज महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाचे पेव फुटले आहे ते नोकरी-धंदा मिळवून उदरभरण करण्याच्या आशेने, मृगजळाने. राज्यकर्ते आणि दांभिक संस्थाचालक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवून स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत. सूज्ञ जनता हे फार काळा सहन करणार नाही, असे ते म्हणाले.