शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:42 IST

नंदकुमार आक्रमक : ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ची अंमलबजावणी नाही

सिंधुदुर्गनगरी : दहावी व बारावी परीक्षेत राज्यात अव्वल असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी फटकारत धारेवर धरले आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या धोरणाची प्राथमिक शाळांमध्ये अंमलबजावणी होत नसल्याची धक्कादायक बाब महाड येथील परिषदेत उघड झाली आहे. याबाबत जिल्ह्याची शैक्षणिकदृष्ट्या तपासणी करणार असल्याचे नंदकुमार यांनी सांगितले, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. राष्ट्र करण्याच्यादृष्टीने १५ जून २०१५ला शासन निर्णय जारी केला. ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे आणि दरवर्षी दहा टक्के गुणवत्ता वाढवावी, असे या निर्णयात म्हटले होते. याचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात प्रधान सचिव नंदकुमार यांनी परिषद आयोजित केली होती. परिषदेत जिल्ह्यातील ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणा’च्या अंमलबजावणीचे सादरीकरण करण्यासाठी शिक्षणाधिकारी धाकोरकर अनुपस्थित राहिले व विस्तार अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. त्यांना प्रगत शैक्षणिकबाबत योग्यरीतीने सादरीकरण करता न आल्याने नंदकुमार यांनी चांगलेच फटकारले.सिंधुदुर्गात कोणत्याच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत या धोरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही, असे सांगत उपक्रम राबविला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली व सिंधुदुर्गच्या शैक्षणिक बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती देत शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अप्रगत राहिल्याचा आरोपही कोरगावकर यांनी केला. यावेळी चंद्रसेन पाताडे, चंद्रकांत अणावकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)सुट्यांचा अधिकार कोणाला?जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालदर्शिकेप्रमाणे शैक्षणिक सुट्या जाहीर केल्या जातात. मात्र, अद्यापपर्यंत ७६ सुट्या कोणत्या तारखांना द्याव्यात याबाबत शिक्षण विभागाने भूमिका जाहीर न केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सुट्या मंजूर कोणी कराव्यात, शालेय व्यवस्थापन समितीने की शिक्षक-पालक संघाने याबाबत भूमिका जाहीर झाली नाही. शिक्षण विभागाने सुट्यांच्या संदर्भातील परिपत्रक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून जबाबदारी झटकून टाकली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या सुट्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असेही राजन कोरगावकर यांनी सांगितले.