शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन हवे

By admin | Updated: November 24, 2015 00:29 IST

रवींद्र वायकर : रत्नागिरीत शिक्षण समन्वय समितीची बैठक

रत्नागिरी : जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात यावे. त्यामुळे उपक्रमांचे यशापयश समोर येईल, त्यातील त्रुटी दूर करता येतील. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यकालीन नियोजन अधिक सुटसुटीत करता येईल, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. ए. आठल्ये, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस, राजापूरच्या नगराध्यक्षा मीना मालपेकर, खेडच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये, दापोलीचे नगराध्यक्ष जावेद मणियार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात यावे. शिक्षण विभागाच्या या शैक्षणिक उपक्रमांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल. शालेयस्तरावर शासकीय योजनांची अंमलबजावणी ही विद्यार्थ्यांची प्रगती केंद्रस्थानी ठेवून करायला हवी. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देतानाच त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्यदेखील उपलब्ध व्हायला हवे. विद्यार्थ्यांना आवश्यक गणवेश, चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य देण्यासाठी गरज पडल्यास प्रशासनाकडून निधी दिला जाईल. अपंग विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना सहाय्यभूत ठरणारे साहित्य उपलब्ध करावे. यासाठी प्रशासनाकडून आणि वैयक्तीक पातळीवरुन आवश्यक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ अशा क्षेत्रांमध्ये सहभागी होेऊ इच्छिणाऱ्या स्वंयसेवी संस्थांना विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे. हे करत असतानाच जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात यावे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यकालीन आवश्यक नियोजन करण्यास सहाय्य होईल, असे वायकर म्हणाले.(प्रतिनिधी)महावितरण, म्हाडाचा आढावासकाळच्या सत्रात पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी महावितरणमार्फत राबविण्यात येणाऱ्या व नव्या गृहनिर्माण धोरणाच्या अनुषंगाने म्हाडाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविता येऊ शकणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. पोलीस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या सहकार्यातून कशाप्रकारे करता येऊ शकेल, याबाबतही माहिती घेतली.