शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बांबू पिकातून आर्थिक उन्नती

By admin | Updated: September 25, 2016 23:14 IST

दत्ताराम खोत : पारंपरिक भातशेतीबरोबरच अन्य व्यवसाय

सावळाराम भराडकर ल्ल वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रगतशील शेतकरी दत्ताराम लक्ष्मण खोत यांनी आपल्या कौशल्य व मेहनतीने कृषीक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बांबू पिकाची लागवड करून एक पाऊल आर्थिक उन्नतीच्या दिशेने पुढे टाकले आहे. सिंधुदुर्गात पारंपरिक भातशेती केली जाते. मात्र, खोत यांनी २०१२ साली त्यांच्याकडील एकूण ८ एकर क्षेत्रामधील ६ एकर क्षेत्रात बांबू लागवड केली. तर उरलेल्या २ एकर क्षेत्रात नारळ व सुपारीचे पीक घेतले. बांबू लागवड करताना ‘माणगा’ व ‘भोवर’ या जातींची लागवड त्यांनी केली. बांबू वाढीसाठी अडथळा होऊ नये, म्हणून ९७१.२१ फुटांच्या अंतरावर लागवड केली. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय खतांचा वापर करत कीटकनाशकांची फवारणीही केली नाही. एका बेटापासून ५ वर्षात किमान २० बांबू मिळतात. बांबू लागवडीच्या पहिल्याच वर्षी आंतरपीक म्हणून काकडीचे उत्पन घेतल्याने त्यांची आर्थिक आवकही चांगली झाली. एका काकडीला बाजारात साधारणत: ६ ते ७ रुपये दर मिळतो. बांबूसाठी पुणे, नाशिक, सांगली, कर्नाटक ही बाजारपेठ उपलब्ध असून, लांजा व दापोली येथील व्यापाऱ्यांनाही बांबूचा पुरवठा केला जातो. कृषीक्षेत्रातील भरीव योगदानामुळे खोत यांना ‘कृषीभूषण’ व ‘सुवर्णकोकण’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या बांबू पीक लागवडीची सखोल शास्त्रोक्त माहिती नुकतीच छत्रपती महाविद्यालय, किर्लोस-ओरस यांच्या ग्रामीण कृषी कायार्नुभव उपक्रमांतर्गत कृषीकन्या हर्षदा नाईक, मोनिका तवटे, अनघा कोयंडे, ऐश्वर्या कुरणे, आदींनी घेतली.