शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बांबू पिकातून आर्थिक उन्नती

By admin | Updated: September 25, 2016 23:14 IST

दत्ताराम खोत : पारंपरिक भातशेतीबरोबरच अन्य व्यवसाय

सावळाराम भराडकर ल्ल वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रगतशील शेतकरी दत्ताराम लक्ष्मण खोत यांनी आपल्या कौशल्य व मेहनतीने कृषीक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बांबू पिकाची लागवड करून एक पाऊल आर्थिक उन्नतीच्या दिशेने पुढे टाकले आहे. सिंधुदुर्गात पारंपरिक भातशेती केली जाते. मात्र, खोत यांनी २०१२ साली त्यांच्याकडील एकूण ८ एकर क्षेत्रामधील ६ एकर क्षेत्रात बांबू लागवड केली. तर उरलेल्या २ एकर क्षेत्रात नारळ व सुपारीचे पीक घेतले. बांबू लागवड करताना ‘माणगा’ व ‘भोवर’ या जातींची लागवड त्यांनी केली. बांबू वाढीसाठी अडथळा होऊ नये, म्हणून ९७१.२१ फुटांच्या अंतरावर लागवड केली. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय खतांचा वापर करत कीटकनाशकांची फवारणीही केली नाही. एका बेटापासून ५ वर्षात किमान २० बांबू मिळतात. बांबू लागवडीच्या पहिल्याच वर्षी आंतरपीक म्हणून काकडीचे उत्पन घेतल्याने त्यांची आर्थिक आवकही चांगली झाली. एका काकडीला बाजारात साधारणत: ६ ते ७ रुपये दर मिळतो. बांबूसाठी पुणे, नाशिक, सांगली, कर्नाटक ही बाजारपेठ उपलब्ध असून, लांजा व दापोली येथील व्यापाऱ्यांनाही बांबूचा पुरवठा केला जातो. कृषीक्षेत्रातील भरीव योगदानामुळे खोत यांना ‘कृषीभूषण’ व ‘सुवर्णकोकण’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या बांबू पीक लागवडीची सखोल शास्त्रोक्त माहिती नुकतीच छत्रपती महाविद्यालय, किर्लोस-ओरस यांच्या ग्रामीण कृषी कायार्नुभव उपक्रमांतर्गत कृषीकन्या हर्षदा नाईक, मोनिका तवटे, अनघा कोयंडे, ऐश्वर्या कुरणे, आदींनी घेतली.