शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सुकाळ, उन्हाळ्यात दुष्काळ

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

दोडामार्गातील स्थिती : नियोजनाचा अभाव; ओहोळांवर छोटे-मोठे बंधारे बांधण्याची गरज

वैभव साळकर - दोडामार्ग -दोडामार्ग तालुक्यात पर्जन्याचे प्रमाण अधिक असूनही के वळ पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने दरवर्षी तालुक्याला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षीदेखील पाणीटंचाईला तालुक्यातील जनतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई भासू नये, यासाठी शासनाने आतापासूनच गावोगावच्या वाडी-वस्तींतून वाहणाऱ्या ओहोळांवर छोटे-मोठे बंधारे घालून पाणी अडविण्याबाबत नियोजन केले पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम गावोगावी राबविणे आवश्यक आहे. मागच्या उन्हाळ्यावर दृष्टिक्षेप टाकल्यास काही गावांना फक्त पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागली होती. मांगेली, उसप, खोक्रल, तेरवण-मेढे, आंबडगाव, वझरे, आदी गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसला. तर तालुक्यातील अन्य गावांनादेखील थोड्या फार प्रमाणात झळ बसली आहे. दोडामार्ग तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही वारंवार पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. कारण पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा कटाक्षाने विचार केला जात नाही. संभाव्य पाणी टंचाईचे संकट आतापासूनच समोर ठेवत गावागावातील ओहोळांवर, ओढ्यांवर बंधारे बांधले पाहिजेत. मध्यंतरी पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून बंधारे बाधण्यासाठी दिला जाणारा निधी पून्हा चालू करत लोकांना बंधारे बांधून पाणी अडविण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. गतवर्षी तालुक्यातील काही शाळा व ग्रामस्थांनी मिळून ओहोळाचे पाणी अडविण्यासाठी छोटे बंधारे घातले. परिणामत: काही प्रमाणात पाणी भूगर्भात जिरविणे शक्य झाले व उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर थोड्या प्रमाणात तरी मात करता आली. त्यामुळे शासन मदत करेल किंवा निधी उपलब्ध करून देणार यावर अवलंबून किंवा याचा विचार करत न राहता आतापासूनच गावागावांतील, वाड्यावाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येत ओहोळांवर बंधारे घालणे आवश्यक आहे. जेणेकरून या अडविलेल्या पाण्याचा पुढे त्यांनाच उन्हाळ्यात उपयोग होईल, या विचाराने काम करणे गरजेचे आहे. गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हे काम केल्यास एका दिवसांत हा बंधारा उभा राहू शक तो. पावसाळ्यानंतर नदीवाटे वाहून जाणारे पाणी अडविण्यासंदर्भात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. बचत गट, स्वयंसेवी संस्था,आदींच्या माध्यमातून कच्चे बंधारे बांधून पाणी अडविण्याची गरज आहे. यासाठी जनमानसांत प्रबोधन होणे आवश्यक आहे.- आनंद कामत, सामाजिक कार्यकर्ते, दोडामार्ग.ग्रामस्थांच्या आशेवर ‘पाणी’गेली तीन चार वर्षे तालुक्यातील ग्रामस्थ शासन मदत करेल या आशेवर होते, मात्र ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविणे बंद केल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. यात ग्रामस्थांनी शासनाच्या धोरणांवर अवलंबून न राहता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम हाती घेतला पाहिजे. त्याचवेळी गावागावांतील विहिरींमधील पाणी आटणार नाही. झऱ्यांचा ओलावा टिकून राहील. उन्हाळयातही शेती करता येईल आणि यातूनच उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई कमी होईल, हे लक्षात ठेवत गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.