शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

उष्णजल प्रक्रिया अहवाल पंधरा दिवसांत

By admin | Updated: March 18, 2015 00:05 IST

आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात.

रत्नागिरी : ज्या फळमाशीच्या कारणासाठी युरोपीय देशांनी हापूस नाकारला, ती फळमाशी नष्ट करण्यासाठी हापूसवर उष्णजल प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पातळ सालीच्या हापूसला ही प्रक्रिया सहन होईल का, याबाबतचे संशोधन आंबा-काजू मंडळातर्फे केले जात आहे. अर्थात त्यासाठी प्रथम फळमाशी तयार करण्यापासून संशोधनाला सुरुवात करावी लागल्याने ‘उष्णजल’च्या अहवालासाठी आणखी १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे तसेच अहमदाबाद येथील मार्केटमध्ये जिल्ह्यातून आंबा विक्रीस पाठविण्यात येत आहे. आंब्याचे प्रमाण कमी असले तरी दरही समाधानकारक नाहीत. १५०० ते ४००० रुपये इतका पेटीला भाव मिळत आहे. आंब्याच्या दर्जाप्रमाणे भाव असे व्यापारी सांगत असले तरी शेतकऱ्यांचे योग्य दराअभावी नुकसान होत आहेशेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी परदेशात आंबा पाठविला जातो. सध्या आखाती प्रदेश वगळला तर अन्य देशांनी घातलेल्या जाचक अटीमुळे सर्रास शेतकऱ्यांना आंबा विक्रीला पाठविणे शक्य होत नाही. बहुधा एप्रिल, मे मध्येच आंबा परदेशात पाठविण्यात येतो. आंबा काजू बोर्डातर्फे पणन विभागामध्ये याबाबतचे संशोधन केले जात आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)आधी फळमाशीची निर्मितीआंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो; परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम पेरूतून फळमाशी निर्मिती, त्यानंतरच फळमाशीचा आंब्यावरील परिणाम व आंब्यावरील उष्णजल प्रक्रिया, त्याचा फळमाशीवर होणारा परिणाम अशा टप्प्याटप्प्याने संशोधन होत आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राथमिक अहवाल तयार होईल, असे अपेक्षित आहे.