शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

उष्णजल प्रक्रिया अहवाल पंधरा दिवसांत

By admin | Updated: March 18, 2015 00:05 IST

आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात.

रत्नागिरी : ज्या फळमाशीच्या कारणासाठी युरोपीय देशांनी हापूस नाकारला, ती फळमाशी नष्ट करण्यासाठी हापूसवर उष्णजल प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पातळ सालीच्या हापूसला ही प्रक्रिया सहन होईल का, याबाबतचे संशोधन आंबा-काजू मंडळातर्फे केले जात आहे. अर्थात त्यासाठी प्रथम फळमाशी तयार करण्यापासून संशोधनाला सुरुवात करावी लागल्याने ‘उष्णजल’च्या अहवालासाठी आणखी १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे तसेच अहमदाबाद येथील मार्केटमध्ये जिल्ह्यातून आंबा विक्रीस पाठविण्यात येत आहे. आंब्याचे प्रमाण कमी असले तरी दरही समाधानकारक नाहीत. १५०० ते ४००० रुपये इतका पेटीला भाव मिळत आहे. आंब्याच्या दर्जाप्रमाणे भाव असे व्यापारी सांगत असले तरी शेतकऱ्यांचे योग्य दराअभावी नुकसान होत आहेशेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी परदेशात आंबा पाठविला जातो. सध्या आखाती प्रदेश वगळला तर अन्य देशांनी घातलेल्या जाचक अटीमुळे सर्रास शेतकऱ्यांना आंबा विक्रीला पाठविणे शक्य होत नाही. बहुधा एप्रिल, मे मध्येच आंबा परदेशात पाठविण्यात येतो. आंबा काजू बोर्डातर्फे पणन विभागामध्ये याबाबतचे संशोधन केले जात आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)आधी फळमाशीची निर्मितीआंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो; परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम पेरूतून फळमाशी निर्मिती, त्यानंतरच फळमाशीचा आंब्यावरील परिणाम व आंब्यावरील उष्णजल प्रक्रिया, त्याचा फळमाशीवर होणारा परिणाम अशा टप्प्याटप्प्याने संशोधन होत आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राथमिक अहवाल तयार होईल, असे अपेक्षित आहे.