शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मांडवी बंदराच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: May 29, 2015 23:44 IST

गेटवे आॅफ रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे आकर्षण असलेली जेटीही आलीय मोडकळीस...

रत्नागिरी : गेटवे आॅफ रत्नागिरी म्हणून प्रसिध्द असलेल्या शहरातील मांडवी बंदर किनाऱ्यावर जेटीच्या प्रवेशद्वारावरच गटाराचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. हे काळे-निळे घाणेरडे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले असून, त्यामुळे येथे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील गटारातून सेप्टीक टॅँकचे पाणीही किनाऱ्यावर वाहून येत असल्याने या बंदरावर ये-जा करणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आाहे. त्यामुळे हे घाणीचे साम्राज्य तत्काळ दूर करण्याची मागणी शहरवासीयांतून केली जात आहे. तालुक्यातील गणपतीपुळे, पावस व अन्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना रत्नागिरीत वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरातील मांडवी जेटी व बंदर येथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, या जेटीवर असलेले पथदीप तुटून फुटून गेले आहेत. जेटीच्या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यातच मांडवी परिसरातील सर्व इमारतींचे सांडपाणी व प्रसाधनगृहांच्या टाक्यांचे घाणपाणीही या गटारात सोडले जात आहे. हे गटार मांडवी बंदर जेटीच्या प्रवेशद्वारापाशीच असून, तेथून चौपाटीवर सर्वत्र हे घाण पाणी पसरले आहे. ही नेहमीचीच समस्या असून, ये- जा करणाऱ्याना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. याच ठिकाणी मेरिटाईम बोर्डाची कार्यालये असून, तेथे मच्छिमारांची नेहमीच ये-जा सुरू असते. त्यामुळे जवळच असलेल्या या दुर्गंधीमुळे कर्मचारी व मच्छिमारांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. पर्यटनवृध्दिसाठी मांडवी किनारा स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असून, याबाबत रत्नागिरी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच प्रवेशद्वारावरील गटाराचे पाणी अन्यत्र नेण्याचीही आवश्यकता आहे. एकीकडे सांडपाण्याची समस्या असतानाच दुसरीकडे मांडवीसारख्या चांगल्या समुद्रकिनाऱ्यावरील बंदर जेटी मोडकळीला आली आहे. अनेक ठिकाणी ही जेटी खचली असून, पर्यटन विकासाच्या माध्यमातून या जेटीचा विकास करून सुशोभिकरण करण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे शहराचे गेटवे असलेल्या मांडवीचा विकास होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)