शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

मांडवी बंदराच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: May 29, 2015 23:44 IST

गेटवे आॅफ रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे आकर्षण असलेली जेटीही आलीय मोडकळीस...

रत्नागिरी : गेटवे आॅफ रत्नागिरी म्हणून प्रसिध्द असलेल्या शहरातील मांडवी बंदर किनाऱ्यावर जेटीच्या प्रवेशद्वारावरच गटाराचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. हे काळे-निळे घाणेरडे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले असून, त्यामुळे येथे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील गटारातून सेप्टीक टॅँकचे पाणीही किनाऱ्यावर वाहून येत असल्याने या बंदरावर ये-जा करणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आाहे. त्यामुळे हे घाणीचे साम्राज्य तत्काळ दूर करण्याची मागणी शहरवासीयांतून केली जात आहे. तालुक्यातील गणपतीपुळे, पावस व अन्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना रत्नागिरीत वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरातील मांडवी जेटी व बंदर येथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, या जेटीवर असलेले पथदीप तुटून फुटून गेले आहेत. जेटीच्या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यातच मांडवी परिसरातील सर्व इमारतींचे सांडपाणी व प्रसाधनगृहांच्या टाक्यांचे घाणपाणीही या गटारात सोडले जात आहे. हे गटार मांडवी बंदर जेटीच्या प्रवेशद्वारापाशीच असून, तेथून चौपाटीवर सर्वत्र हे घाण पाणी पसरले आहे. ही नेहमीचीच समस्या असून, ये- जा करणाऱ्याना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. याच ठिकाणी मेरिटाईम बोर्डाची कार्यालये असून, तेथे मच्छिमारांची नेहमीच ये-जा सुरू असते. त्यामुळे जवळच असलेल्या या दुर्गंधीमुळे कर्मचारी व मच्छिमारांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. पर्यटनवृध्दिसाठी मांडवी किनारा स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असून, याबाबत रत्नागिरी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच प्रवेशद्वारावरील गटाराचे पाणी अन्यत्र नेण्याचीही आवश्यकता आहे. एकीकडे सांडपाण्याची समस्या असतानाच दुसरीकडे मांडवीसारख्या चांगल्या समुद्रकिनाऱ्यावरील बंदर जेटी मोडकळीला आली आहे. अनेक ठिकाणी ही जेटी खचली असून, पर्यटन विकासाच्या माध्यमातून या जेटीचा विकास करून सुशोभिकरण करण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे शहराचे गेटवे असलेल्या मांडवीचा विकास होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)