शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
5
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
6
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
7
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
8
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
9
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
10
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
11
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
12
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
13
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
14
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
15
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
16
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
17
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
18
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
19
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
20
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?

चुकीच्या यादीमुळे रखडले वितरण

By admin | Updated: October 25, 2015 23:55 IST

रत्नागिरी तालुका : अडीच कोटी नुकसानभरपाईचे वाटप

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने फळपिकासाठी नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील तलाठ्यांनी चुकीची यादी दिल्यामुळे काही गावांना अद्याप नुकसान भरपाई वितरीत करण्यात आलेली नाही. तालुक्यातील १३ हजार ६२ खातेदारांपैकी ४ हजार ३२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे.जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे आंबापीक असून, जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च मध्ये सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पावसाचा परिणाम झाल्याने ७२.६३ टक्के नुकसान झाले होते. सतत दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे फुलोरा धुवून निघाला. शिवाय ज्या फुलोऱ्याला कणी ते सुपारीएवढी फळधारणा झाली होती, त्या फुलोऱ्यामध्ये पाणी साचून कुजण्याबरोबर फळे गळून पडली. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडले होते.जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आल्याने काजूचे ६१.२० टक्के पिकाचे नुकसान झाले. शासनाने शेतकरीनिहाय पंचनामा करण्याचे आदेश देऊन त्यासाठी ग्रामसेवक, कृषी सेवक व कृषी अधिकारी यांच्या त्रिस्तरीय समिती स्थापन केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८६४ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र, वितरण प्रक्रिया अद्याप संथगतीने सुरू आहे.रत्नागिरी तालुक्यातील १३ हजार ६२ शेतकऱ्यांसाठी १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. पैकी १६३९ शेतकऱ्यांना २ कोटी ६८ लाख २७ हजार ९०२ रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत. १६३९ शेतकरी सिंगल खातेदार आहेत, तर २३९३ सामाईक खातेदारांना ७९ लाख ७० हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून सातबारा व बँकेचा खाते नंबर घेण्यात आला होता. मात्र, खाते नंबर चुकल्यामुळे ६२ लाख ८१ हजार २६३ रुपयांचे धनादेश परत आले आहेत. त्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांकडून खाते नंबर घेणे सुरू आहे.काही गावातील शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांनी अद्याप दिली नसल्यामुळे तेथील आंबा नुकसान भरपाई वितरणाचे धनादेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामध्ये नेवरे गावाचा समावेश आहे. तहसील कार्यालयाकडे चौकशी केली असता, तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांची यादी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. तलाठी रजेवरून आल्यावर यादी मिळाल्यानंतर धनादेश काढण्यात येतील, असेही सांगण्यात आले.आंबा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाकडून तुटपंूजी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. मात्र, कर्मचारीवर्गाच्या दिरंगाईमुळे आॅक्टोबर संपला तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. रत्नागिरी तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत अतिशय संथगतीने वितरणाचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)बेफिकीर तलाठी : काही गावांत भरपाई नाहीआधीच सातबारा उताऱ्यावर अनेकांची नावे असल्यामुळे नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामध्ये आता तलाठ्यांच्या चुकीचाही फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.