शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

चुकीच्या यादीमुळे रखडले वितरण

By admin | Updated: October 25, 2015 23:55 IST

रत्नागिरी तालुका : अडीच कोटी नुकसानभरपाईचे वाटप

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने फळपिकासाठी नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील तलाठ्यांनी चुकीची यादी दिल्यामुळे काही गावांना अद्याप नुकसान भरपाई वितरीत करण्यात आलेली नाही. तालुक्यातील १३ हजार ६२ खातेदारांपैकी ४ हजार ३२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे.जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे आंबापीक असून, जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च मध्ये सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पावसाचा परिणाम झाल्याने ७२.६३ टक्के नुकसान झाले होते. सतत दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे फुलोरा धुवून निघाला. शिवाय ज्या फुलोऱ्याला कणी ते सुपारीएवढी फळधारणा झाली होती, त्या फुलोऱ्यामध्ये पाणी साचून कुजण्याबरोबर फळे गळून पडली. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडले होते.जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आल्याने काजूचे ६१.२० टक्के पिकाचे नुकसान झाले. शासनाने शेतकरीनिहाय पंचनामा करण्याचे आदेश देऊन त्यासाठी ग्रामसेवक, कृषी सेवक व कृषी अधिकारी यांच्या त्रिस्तरीय समिती स्थापन केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८६४ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र, वितरण प्रक्रिया अद्याप संथगतीने सुरू आहे.रत्नागिरी तालुक्यातील १३ हजार ६२ शेतकऱ्यांसाठी १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. पैकी १६३९ शेतकऱ्यांना २ कोटी ६८ लाख २७ हजार ९०२ रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत. १६३९ शेतकरी सिंगल खातेदार आहेत, तर २३९३ सामाईक खातेदारांना ७९ लाख ७० हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून सातबारा व बँकेचा खाते नंबर घेण्यात आला होता. मात्र, खाते नंबर चुकल्यामुळे ६२ लाख ८१ हजार २६३ रुपयांचे धनादेश परत आले आहेत. त्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांकडून खाते नंबर घेणे सुरू आहे.काही गावातील शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांनी अद्याप दिली नसल्यामुळे तेथील आंबा नुकसान भरपाई वितरणाचे धनादेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामध्ये नेवरे गावाचा समावेश आहे. तहसील कार्यालयाकडे चौकशी केली असता, तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांची यादी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. तलाठी रजेवरून आल्यावर यादी मिळाल्यानंतर धनादेश काढण्यात येतील, असेही सांगण्यात आले.आंबा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाकडून तुटपंूजी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. मात्र, कर्मचारीवर्गाच्या दिरंगाईमुळे आॅक्टोबर संपला तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. रत्नागिरी तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत अतिशय संथगतीने वितरणाचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)बेफिकीर तलाठी : काही गावांत भरपाई नाहीआधीच सातबारा उताऱ्यावर अनेकांची नावे असल्यामुळे नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामध्ये आता तलाठ्यांच्या चुकीचाही फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.