शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांना डोकेदुखी

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

सावंतवाडीतील घरफोड्या : नागरिकांकडून वाढते दडपण, स्थानिक युवकांकडे वक्रदृष्टी...--वार्तापत्र सावंतवाडी

अनंत जाधव - सावंतवाडी शहरात सतत घडणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. या चोऱ्यांमध्ये बाहेरील व्यक्तीबरोबरच स्थानिकांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. मौजमजेचे जीवन जगणारे युवक व जिल्ह्यात सुरू असलेले वाढते अवैध धंदेच या चोऱ्यांना कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.सावंतवाडी शहरात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात चोरीचे सत्र सुरू आहे. चराठा भागात तर बंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष केले. मात्र, या घरात त्यांना कोणतीही चीजवस्तू मिळाली नसली तरी चोरट्यांनी आपली जरब निर्माण करीत पोलिसांच्या नाकात दम आणला आहे. त्यातच खासकिलवाडा भागात तर चोरट्यांनी दोन बंगले फोडले तर शनिवारी बाहेरचावाडा येथील घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत. अशा घडणाऱ्या चोऱ्यांमुळे सावंतवाडी पोलीस चांगलेच हैराण झाले आहेत.कणकवली चोरीप्रकरणी अनेक उच्चशिक्षित युवक अडकले असल्याने यावरून हे युवक ऐषआरामाचे जीवन जगण्यासाठी चोरीचे अस्त्र उचलत असल्याचे दिसून येत आहे. उच्चशिक्षित असल्याने कोणाचे आपल्यावर लक्ष जाणार नाही. त्यामुळे आपण सहजरीत्या चोरी करून सुटून जाऊ, असे या युवकांना वाटत आहे. काही युवक जीवन ऐषआरामी करण्यासाठी चोरी करीत आहेत, तर काही युवकांना मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा नाद लागल्याने ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. तसाच प्रकार सावंतवाडीतही होऊ शकतो. कारण परिसरात अनेक अवैध धंदे चालत आहेत. यात जुगार, मटका, आदी अवैध धंद्यांच्या आहारी काही युवक गेले असून, या धंद्यांसाठी लागणारा पैसा कोठून उभा करायचा, असा प्रश्न या युवकांपुढे पडतो. मग काही युवक या धंद्यासाठीही चोरी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे आदर्श कोणाचा ठेवावा, असा पोलिसांपुढे प्रश्न असून, सावंतवाडीतील चोऱ्यांमध्ये स्थानिक नसतील, पण या चोऱ्या रोखण्यासाठी उपाय तरी काय आहेत अशी हतबलता पोलिसांपुढे आली असून, ते अनेक प्रकरणांत चाचपडत तपास करीत असल्याचे दिसून येत आहेत.महत्त्वाचे नाके बेभरवशीरात्रीच्या गस्तीबरोबरच पोलिसांनी शहरात दिवसाची गस्त ही मोठ्या प्रमाणात वाढविली आहे; पण जे महत्त्वाचे नाके आहेत त्या नाक्याची सुरक्षा बेभरवशाची बनली आहे. काही नाक्यांवर तर पोलिसांऐवजी होमगार्डच आहेत. काही नाक्यांवर तर महिला पोलीसांचीच ड्यूटी लावली आहे. पण, त्या मोबाईलवरच ड्युटी करीत असल्याने अनेकवेळा चोरीचे गंभीर गुन्हे घडत असून, ही त्याबाबत नव्या व्यक्तींवर, गाड्यांवर लक्ष ठेवणे या पोलिसांना जमत नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती जरी चोरीच्या उद्देशाने शहरात आले असले तरी त्यांच्या हालचाली टिपणे अवघड काम असते.