शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उधाणामुळे पंधरामाड येथील वस्तीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:05 IST

सतर्कतेच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शहरानजीकच्या पंधरामाड-मिऱ्या भागात लाटांचा जोर वाढल्याने येथील वस्तीला धोका निर्माण झाला असून, घरासमोरील रस्ताही खचला आहे. मध्यरात्री तसेच आज, रविवारी पुन्हा मोठ्या लाटांचा मारा सोसावा लागणार असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील उधाणाच्या लाटांचा मारा येथील किनारपट्टीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील ३४ घरांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून मिऱ्या भागातील नागरिक समुद्राच्या अतिक्रमणाच्या धोक्याला सामोरे जात आहेत.शनिवारी अमावस्येच्या भरतीमुळे समुद्राच्या पाण्याने पंधरामाड भागातील वस्तीत प्रवेश करण्यास सुरुवात केली. लाटांच्या माऱ्यामुळे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या भागातील जगदीश पेजे आणि गोपीनाथ पोपडे यांच्या घरासमोरील रस्त्याला मोठे भगदाड पडून या भागातील माती ढासळली. दुपारी आलेल्या भरतीने या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले.१९८८ साली मिरकरवाडा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पुढेपर्यंत आणल्याने या भागाला समुद्राच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.हा भाग नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये येत असल्याने रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी या भागात तातडीने भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक राजेश नागवेकर, पल्लवी पाटील उपस्थित होते. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पाचारण करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या भागात जेसीबीच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात दगडांचा बंधारा टाकण्यात आला आहे. मात्र, शनिवारी दुपारपासून अमावस्येला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रात्रीपासून रविवारपर्यंत लाटांचा जोर कायम राहणार असल्याने या भागातील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे.मिऱ्यावासीयांची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी या भागाची पाहणी रत्नागिरीचे मंडल अधिकारी तसेच तलाठी यांनी केली. सतर्कतेच्या सूचनायेत्या आॅगस्ट महिन्यातील ९, १० २१, आणि २४ आॅगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यातील ८ आणि २० रोजी समुद्रात उधाणाच्या लाटा निर्माण होणार आहेत. त्यामुळे या भागातील ३४ घरांना सतर्कतेच्या सूचना तहसील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.