शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे आंब्याच्या नशिबी यंदाही धोकाच?

By admin | Updated: October 23, 2014 22:48 IST

समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६४ टक्क्यांपर्यंत असले तरी किमान तापमान २५ अंशांपर्यंत वाढले

कणकवली : राजकीय गरमागरमी सुरू असतानाच आॅक्टोबरचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच दिवाळीचं अभ्यंगस्नान करताना अंगावर काटा उभा करणारी थंडी अनुभवाला येण्याऐवजी पहाटे घामाच्या धारांचा अनुभव येत होता. मंगळवारी ३६ अंशापर्यंत पोहोचलेले तापमान गुरूवारी ३३ अंशावर आले असून, ते पुढील तीन दिवस वाढणार नाही, अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्येही तापमान ३0 अंशापेक्षा जास्तच राहील, असा अंदाज असल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया काहीशी उशिरा सुरू होण्याची भीती आहे. तसे झाले तर आंब्याला यंदाही नुकसानाच्याच वाटेवरून प्रवास करावा लागेल.आधी निवडणुका आणि मतमोजणीनंतर आता सत्ता स्थापनेवरून वणवा पेटला आहे. एका बाजूला ही राजकीय गरमागरमी असताना दुसऱ्या बाजूला आॅक्टोबरचा तडाखाही चांगलाच जाणवत आहे.समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६४ टक्क्यांपर्यंत असले तरी किमान तापमान २५ अंशांपर्यंत वाढले आहे. त्यामुळेच उष्मा अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. १६, १७ आणि २१ आॅक्टोबरला रत्नागिरीत ३६ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. पावसाळ्यानंतरचे रत्नागिरीतील हे सर्वाधिक तापमान आहे. १८, १९ आणि २0 असे सलग तीन दिवस ३५ अंश इतके तापमान होते. मंगळवारी ३६ अंशांवर गेलेले तापमान बुधवारी तीन अंशांनी कमी झाले आहे. अर्थात किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यानच असल्याने उष्म्याची झळ चांगलीच जाणवू लागली आहे.येणारे तीन दिवस तापमान ३३ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज आहे. त्यानंतर ते २६ अंशांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. अर्थात परत नोव्हेंबरमध्ये ते ३0 अंशापेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आपल्या संकेतस्थळावर पुढील काही दिवसात उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.कोकणातील हापूस हे मुख्य फळपीक. गेली काही वर्षे बेभरवशी हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठी झळ सोसावी लागली आहे. आंब्याचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे मोहोराचा. थंडी जेवढी अधिक पडते, तेवढा मोहोर वाढतो. योग्य वेळेत थंडी कमी झाली तर मोहोराला फलधारणा होते आणि आंब्याची चांगली वाढ होते. ज्या-ज्या वर्षी किमान तापमान १७ ते १९ अंशांदरम्यान राहिले होते, त्या वर्षी हापूस चांगल्या प्रमाणात आला होता. मात्र, आताचे अंदाज पाहता नोव्हेंबरमध्येही कमाल तापमान ३0 अंशापेक्षा अधिक आणि किमान तापमान २१-२२ अंश इतके राहण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास थंडी लांबेल आणि मोहोर येण्याची वेळही पुढे जाईल, अशी भीती आहे. (प्रतिनिधी)उन्हाळा लांबला तर साहजिक आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन आंब्याचा हंगाम थोडा पुढे जातो, हा अनुभव याआधीही आला आहे. त्याचा प्रत्यक्ष पिकावर किती परिणाम होईल, हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही.- हेमंत सावंत,कृषीतज्ज्ञ, कणकवली,