शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कचरा समस्येमुळे नदीपात्रांना धोका

By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST

असीम सरोदे : सावंतवाडीत ‘फू्रट अ‍ॅण्ड फ्लॉवर’ महोत्सवात परिसंवाद

सावंतवाडी : विकास आणि पर्यावरणाची सांगड घालायची म्हणजे खूप कठीण आहे. दैनंदिन जीवनातील पदार्थच नष्ट झाले तर पुढे काय होणार? सिंधुुदुर्ग जिल्ह्यात कचऱ्याची समस्या मोठी आहे. कुडाळ शहरातील सर्व कचरा भंगसाळ नदीत जाळला जातो. त्यामुळे नदीपात्राला धोका निर्माण झाला आहे. पुढील आपत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले. येथील ‘फ्रूट अ‍ॅण्ड फ्लॉवर’ महोत्सवात रविवारी सायंकाळी ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि कोकणाची जैवविविधता’ या परिसंवाद कार्यक्रमात अ‍ॅड. सरोदे बोलत होते. यावेळी अ‍ॅड. सुहास सावंत, क्लार्ड अरवा, प्रा. बाळकृष्ण गावडे, नगराध्यक्ष बबन साळगावकर, आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या तुलनेने सावंतवाडीत कचऱ्याचे ढीग नाहीत. शहरात चांगली स्वच्छता दिसून येत आहे. मात्र, अन्य ठिकाणी कचऱ्यांचे आगार आढळून येत आहेत. राजकारणातूनच कचऱ्याचा उगम झाला आहे. त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असेही यावेळी अ‍ॅड. सरोेदे यांनी सांगितले. जैवविविधता टिकली पाहिजे. पर्यावरण विषय समजून घेणे कठीण आहे. पर्यावरण हा आपला अविभाज्य घटक आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी प्रशिक्षण दिले जात नसल्याबाबत अ‍ॅड. सरोदे यांनी खंत व्यक्त केली. गावपातळीवर जैवविविधता मंडळे स्थापन करणे आवश्यक आहे. गावचे नैसर्गिक स्रोत गावाच्या मालकीचे असणे आवश्यक आहे. जैवविविधता मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. सध्या जैवविविधता मंडळावर अध्यक्ष नाही. यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांना पत्र द्या, असे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले. पोलिसांना खून, अपघात, चोरीचे कायदे वगळता अन्य कायद्यांचे ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना अ‍ॅडव्हान्स कायद्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पर्यावरण विषयावर काम करणे कठीण झाले आहे. वाळू माफियांपासूनही पोलीस संरक्षण घ्यावे लागत आहे. यावरून परिस्थितीचा अंदाज येतो. पूल, इमारती झाल्याच पाहिजेत. याला आमचा विरोध नाही, परंतु पर्यावरणाला बाधा पोहोचवून कामे करणे चुकीचे आहे, असे यावेळी अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार महेंद्र पराडकर यांच्या ‘सागरी अभयारण्य-एक अनुत्तरीत प्रश्न’ व ‘मच्छिमार जगत पर्ससीन नेटवरील हल्लाबोल’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (वार्ताहर)शासनाने बेरोजगारांना काम द्यावेगुजरात नर्मदा डॅमजवळ आदिवासी वस्ती पाडून सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी वल्लभभार्इंचे विचार शिकण्यासाठी कोणीही जाणार नाही, तर मौजमजा करण्यासाठी लोक जाणार आहेत. यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न पुतळ्यापासून न करता बेरोजगारांच्या दोन्ही हाताला काम देऊन करा. स्त्रियांच्या संरक्षणाची काळजी पंतप्रधानांनी करणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केले.