शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यात दोघांचा तापाने मृत्यू

By admin | Updated: September 27, 2015 00:19 IST

तापसरीच्या रूग्णांमध्ये वाढ : आरोग्य विभागासमोर आव्हान

नांदगांव : कणकवली तालुक्यातील नांदगांव मधलीवाडी येथील विजय वसंत पाटील यांचे डेंग्यूच्या तापाने उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ९.३० वाजता कणकवली येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. तर फोंडाघाट रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष मोहन विष्णू गोसावी (वय ५८) यांचा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. गेले चार दिवस मोहन गोसावी यांना ताप येत होता. खासगी डॉक्टरची ते औषधे घेत होते. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (गृह मंत्रालय) दलात रँक एचसीआयजीडी हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले पाटील हे गणेशोत्सवासाठी आपल्या नांदगाव या गावी आले होते. त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नांदगांव मधलीवाडी येथे मूळ गाव असलेले विजय पाटील हे १८ सप्टेंबरला गावी आले. नोकरीनिमित्त ते उत्तर प्रदेशात कार्यरत होते. १५ सप्टेंबरला ते मुंबईला डोंबिवली येथील घरी आले आणि तिथून ते गणेशोत्सवासाठी गावी आले. गावी आल्यानंतर त्यांचे अंग दुखत होते. नेहमी सर्वांमध्ये मिसळणारे असूनही गणपतीत ते भजनाला गेले नाहीत. त्यानंतर नांदगांव येथील खासगी रुग्णालयात गेले. तेथे बरे वाटल्याने भजनाला जावू लागले. याच दरम्यान त्यांना तब्येतीत थोडे अत्यवस्थ वाटू लागले. यानंतर ते पुन्हा खासगी रुग्णालयात गेले. मात्र, तब्येतीत कोणतीही सुधारणा नसल्याने ते २३ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता थोडा त्रास होऊ लागल्याने नांदगांव प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी गेले. त्यावेळी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना कणकवली येथे उपचारासाठी जाण्यास सांगितले. त्यावेळी पाटील यांना खोकला आणि धाप जास्त लागत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तिथून त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यावेळी झालेल्या चाचणीत कोणताही निष्कर्ष आला नाही. मात्र २४ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजता डेंग्यूचा ताप असल्याचे निदान केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तब्येतीत सुधारणा होत नव्हती. २५ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता आयसीयूमध्ये दाखल केले. त्यानंतर ४.३० वाजता व्हेंटीलेटरवर ठेवले व तब्येत खालावल्यामुळे पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. यावेळी पुन्हा एकदा उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यावेळी डॉक्टरांच्या निरीक्षणानंतर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. मात्र अधिक प्रकृती खालावल्यामुळे अखेर २५ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता उपचारादरम्यान पाटील यांचे निधन झाले. पाटील यांनी गेली १९ वर्षे देशसेवा केली. आपल्या कुटुंबासोबत त्यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारल्याने कुटुंबाबरोबर ते जास्त राहू शकले नाहीत. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबासह नांदगांव गावावर शोककळा पसरली आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वडील, तीन मुली असा परिवार आहे. शनिवारी दुपारी नांदगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)