शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

कणकवली तालुक्यात दोघांचा तापाने मृत्यू

By admin | Updated: September 27, 2015 00:19 IST

तापसरीच्या रूग्णांमध्ये वाढ : आरोग्य विभागासमोर आव्हान

नांदगांव : कणकवली तालुक्यातील नांदगांव मधलीवाडी येथील विजय वसंत पाटील यांचे डेंग्यूच्या तापाने उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ९.३० वाजता कणकवली येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. तर फोंडाघाट रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष मोहन विष्णू गोसावी (वय ५८) यांचा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. गेले चार दिवस मोहन गोसावी यांना ताप येत होता. खासगी डॉक्टरची ते औषधे घेत होते. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (गृह मंत्रालय) दलात रँक एचसीआयजीडी हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले पाटील हे गणेशोत्सवासाठी आपल्या नांदगाव या गावी आले होते. त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नांदगांव मधलीवाडी येथे मूळ गाव असलेले विजय पाटील हे १८ सप्टेंबरला गावी आले. नोकरीनिमित्त ते उत्तर प्रदेशात कार्यरत होते. १५ सप्टेंबरला ते मुंबईला डोंबिवली येथील घरी आले आणि तिथून ते गणेशोत्सवासाठी गावी आले. गावी आल्यानंतर त्यांचे अंग दुखत होते. नेहमी सर्वांमध्ये मिसळणारे असूनही गणपतीत ते भजनाला गेले नाहीत. त्यानंतर नांदगांव येथील खासगी रुग्णालयात गेले. तेथे बरे वाटल्याने भजनाला जावू लागले. याच दरम्यान त्यांना तब्येतीत थोडे अत्यवस्थ वाटू लागले. यानंतर ते पुन्हा खासगी रुग्णालयात गेले. मात्र, तब्येतीत कोणतीही सुधारणा नसल्याने ते २३ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता थोडा त्रास होऊ लागल्याने नांदगांव प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी गेले. त्यावेळी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना कणकवली येथे उपचारासाठी जाण्यास सांगितले. त्यावेळी पाटील यांना खोकला आणि धाप जास्त लागत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तिथून त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यावेळी झालेल्या चाचणीत कोणताही निष्कर्ष आला नाही. मात्र २४ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजता डेंग्यूचा ताप असल्याचे निदान केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तब्येतीत सुधारणा होत नव्हती. २५ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता आयसीयूमध्ये दाखल केले. त्यानंतर ४.३० वाजता व्हेंटीलेटरवर ठेवले व तब्येत खालावल्यामुळे पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. यावेळी पुन्हा एकदा उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यावेळी डॉक्टरांच्या निरीक्षणानंतर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. मात्र अधिक प्रकृती खालावल्यामुळे अखेर २५ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता उपचारादरम्यान पाटील यांचे निधन झाले. पाटील यांनी गेली १९ वर्षे देशसेवा केली. आपल्या कुटुंबासोबत त्यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारल्याने कुटुंबाबरोबर ते जास्त राहू शकले नाहीत. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबासह नांदगांव गावावर शोककळा पसरली आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वडील, तीन मुली असा परिवार आहे. शनिवारी दुपारी नांदगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)