शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पटसंख्येअभावी तालुक्यातील एकही शाळा बंद करू नये

By admin | Updated: August 5, 2014 00:04 IST

वैभववाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव

वैभववाडी : तालुका अतिदुर्गम आणि डोंगराळ असून शैक्षणिक सुविधा अपुऱ्या आहेत. खेड्यातील मुलांना शिक्षणासाठी दळणवळणाच्या सोयी नाहीत. त्यामुळे पटसंख्येअभावी तालुक्यातील एकही शाळा बंद करू नये असा ठराव पंचायत समिती सभेत घेण्यात आला. पटसंख्येअभावी आता शाळाबंद केल्या तर भविष्यात त्या त्या वाड्या वस्त्यांवरील मुले शिक्षण प्रवाहातून बाहेर राहू शकतात असेही ठरावात नमूद करण्यात आले.पंचायत समितीची मासिक सभा सभापती नासीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मासिक सभेला उपसभापती बंड्या मांजरेकर, सदस्य मंगेश गुरव, शोभा सुतार, शुभांगी पवार, गटविकास अधिकारी एम. एम. जाधव व खातेप्रमुख उपस्थित होते.सभागृहातील ठराव आणि सूचनांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून होत नसल्याबद्दल सभापती काझी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सभागृहात ठराव मांडताक्षणी संबंधितांनी तांत्रिक मत मांडावे. तसे न करता ते नियमात बसत नाहीत म्हणून कागदावरच ठेवणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे त्यांनी ठणकावले. तसेच पंचायत समिती स्तरावर नवीन लेखाशीर्ष तयार करण्यासंदर्भात ठराव करून तो मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्याची सूचना काझींनी केली.आर्थिक गैरव्यवहार, कामातील अनियमितता, ग्रामस्थांच्या तक्रारी अशा कारणांनी बदनाम ग्रामसेवकांना तालुक्याबाहेर घालवून जिल्हा परिषदेने सहकार्य करावे. वादग्रस्त ग्रामसेवकांमुळे विकासावर परिणाम होत असून नागरीकांची गैरसोय होत आहे अशी मागणी सभेत करण्यात आली. निसर्गाचा लहरीपणा पाहता प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवावे अशी मागणी काझी यांनी केली. तालुक्यातील बऱ्याच अंगणवाडीच्या इमारतींना विद्युत पुरवठा नाही आणि ज्याठिकाणी वीज पुरवठा सुरु आहे त्याचे शुल्क व्यावसायिक दराने केले जात असल्याने ग्रामपंचायतींना ते डोईजड होत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलित योजनेतून अंगणवाड्यांना सौर युनिट पुरविण्याची मागणी प्रकल्प अधिकारी शरद मगर यांनी केली. (प्रतिनिधी)