शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

पावणेसहा कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 29, 2015 00:12 IST

पाणीटंचाई : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सभेत माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ गावे ६५८ वाड्यांचा ५ कोटी ७५ लाख रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे, सदस्य जनार्दन तेली, राजेंद्र रावराणे, वासुदेव परब, भारती चव्हाण, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षीचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा जाहीर करण्यात आला असून यात ३ गावे व ६५८ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यासाठी ५ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. सर्व तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट असणाऱ्या गावांच्या कामांची अंदाजपत्रके प्राप्त झाली असून ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली. तसेच या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर कामांना सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)देवगड येथील शिक्षण विकास मंडळाच्या महाविद्यालयामध्ये परजिल्ह्यातील २७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांना पाण्याची सोय नाही. संबंधित संस्थेने पैसे भरूनही अद्याप पाणी मिळत नाही. याकडे सदस्य जनार्दन तेली यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता विद्यार्थी पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी तत्काळ पाण्याची सोय उपलब्ध करून द्या असे आदेश अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.देवगड व विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजना तोट्यात चालविली जात आहे. या दोन्ही योजना सुरु ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला निधीची कसरत करावी लागत आहे. या योजनांची पाणीपट्टी वसुली होत नाही. दोन्ही नळपाणी योजनांवर ९५ लाख रुपये खर्च झाला असून पाणीपट्टीमार्फत होणारी वसुली मात्र १६ लाख रुपये आहे. त्यामुळे या योजना तोट्यात चालविल्या जात आहेत.जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयाची बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. परंतु आता शौचालयाच्या टाक्या तुंबल्या आहेत. तरी या टाक्या साफ करण्यासाठी व मैला उचलण्यासाठी वाहन खरेदीसाठी निधी मिळावा असा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात यावा असा ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)१0२ शाळांत पाण्याचा ठणठणाटसिंंधुदुर्ग जिल्ह्यात १४६८ शाळा असून त्यापैकी १०२ शाळांमध्ये मे अखेर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी दिली. शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय होणे अनिवार्य असताना जिल्ह्यात काही वेगळेच चित्र दिसून येत आहे. अशा शाळा टंचाई आराखड्यात प्राधान्याने घ्याव्यात व विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था करा असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले.२00 विहिरी दूषितसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील १९०० शासकीय विहिरींचे पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी २०० पाणी नमुने दूषित आढळले असून हे सर्व पाणी नमुने पुन्हा शुद्ध करून पाणी पिण्यायोग्य केले असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.