शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करा

By admin | Updated: September 22, 2014 01:00 IST

मोहन केळूसकर : महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

कणकवली : कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानुप्रसाद तायल यांच्या नियोजनशून्य गैरकारभारामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. तरीही दक्षिणेकडील राज्यांच्या मागणीनुसार या मार्गावर अजूनही काही नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोकणवासियांच्या त्यागातून हा मार्ग अस्तित्वात आला आहे. त्यामुळे प्रथम कोकणवासियांना प्राधान्य द्या. या मार्गावर क्षमतेच्या बाहेर गाड्या चालवायच्या असतील तर या मार्गाचे तातडीने दुपदरीकरण करा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी महामंडळाचे संपर्क अधिकारी करंदीकर यांच्याकडे केली आहे.कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या बेलापूर येथील कार्यालयावर मोर्चा नेण्याचे कोकण विकास आघाडीने जाहीर केले होते. मात्र आचारसंहितेमुळे हा मोर्चा स्थगित झाला. मात्र, आघाडीने मोहन केळूसकर यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी करंदीकर यांच्याशी बेलापूर येथील सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये चर्चा केली. यावेळी केळूसकर बोलत होते.प्रशासनाने मोर्चाला स्थगिती दिली. मात्र, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी तडक बेलापूर गाठले. त्यावेळी सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कारेकर यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये पाचारण केले. तसेच महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्येच एका कक्षामध्ये कोकण रेल्वेप्रश्नी चर्चा झाली.ते म्हणाले, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनामध्ये सामंजस्य नसल्याने कोकणवासिय प्रवासी भरडला गेलाच, पण मुंबईकडे परतताना या प्रवाशांनी कोकण रेल्वेची एवढी धास्ती घेतली की त्याने एसटी आणि खासगी गाड्यांतून प्रवासाला प्राधान्य दिले. परिणामी रेल्वेला नुकसान झाले. एकीकडे काही नियमित गाड्या रद्द केल्या. मात्र हंगामी गाड्या चालू होत्या. नियमित गाड्यांतील आरक्षित प्रवाशांची सोय या रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांतून केली असती तर प्रवाशांना मनस्ताप झाला नसता.या चर्चेमध्ये कोकण विकास आघाडीचे सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊ परब, रमाकांत जाधव, भाई चव्हाण, काका जाधव, नरेंद्र म्हात्रे, भालचंद्र तारी, चंद्रकांत फटकरे, नागेश घाडीगावकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)