शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करा

By admin | Updated: September 22, 2014 01:00 IST

मोहन केळूसकर : महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

कणकवली : कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानुप्रसाद तायल यांच्या नियोजनशून्य गैरकारभारामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. तरीही दक्षिणेकडील राज्यांच्या मागणीनुसार या मार्गावर अजूनही काही नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोकणवासियांच्या त्यागातून हा मार्ग अस्तित्वात आला आहे. त्यामुळे प्रथम कोकणवासियांना प्राधान्य द्या. या मार्गावर क्षमतेच्या बाहेर गाड्या चालवायच्या असतील तर या मार्गाचे तातडीने दुपदरीकरण करा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी महामंडळाचे संपर्क अधिकारी करंदीकर यांच्याकडे केली आहे.कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या बेलापूर येथील कार्यालयावर मोर्चा नेण्याचे कोकण विकास आघाडीने जाहीर केले होते. मात्र आचारसंहितेमुळे हा मोर्चा स्थगित झाला. मात्र, आघाडीने मोहन केळूसकर यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी करंदीकर यांच्याशी बेलापूर येथील सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये चर्चा केली. यावेळी केळूसकर बोलत होते.प्रशासनाने मोर्चाला स्थगिती दिली. मात्र, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी तडक बेलापूर गाठले. त्यावेळी सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कारेकर यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये पाचारण केले. तसेच महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्येच एका कक्षामध्ये कोकण रेल्वेप्रश्नी चर्चा झाली.ते म्हणाले, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनामध्ये सामंजस्य नसल्याने कोकणवासिय प्रवासी भरडला गेलाच, पण मुंबईकडे परतताना या प्रवाशांनी कोकण रेल्वेची एवढी धास्ती घेतली की त्याने एसटी आणि खासगी गाड्यांतून प्रवासाला प्राधान्य दिले. परिणामी रेल्वेला नुकसान झाले. एकीकडे काही नियमित गाड्या रद्द केल्या. मात्र हंगामी गाड्या चालू होत्या. नियमित गाड्यांतील आरक्षित प्रवाशांची सोय या रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांतून केली असती तर प्रवाशांना मनस्ताप झाला नसता.या चर्चेमध्ये कोकण विकास आघाडीचे सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊ परब, रमाकांत जाधव, भाई चव्हाण, काका जाधव, नरेंद्र म्हात्रे, भालचंद्र तारी, चंद्रकांत फटकरे, नागेश घाडीगावकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)