शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

दुप्पट बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

By admin | Updated: October 8, 2015 00:33 IST

संभाव्य टंचाईबाबत नियोजन : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सभा

सिंधुदुर्गनगरी : यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा शेकडो मिमी पाऊस कमी पडल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षी तब्बल १३ हजार ४०० कच्चे व वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्याचे निश्चित केले आहे. बंधारे बांधण्याची कार्यवाही आॅक्टोबर अखेरपासून सुरु होणार आहे. बंधाऱ्यांसाठी लागणाऱ्या ६ लाख रिकाम्या पिशव्यांचे नियोजन करा असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, समिती सदस्य जनार्दन तेली, दीपलक्ष्मी पडते, भारती चव्हाण, संजीवनी लुडबे, वासुदेव परब, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले असून उपाययोजना म्हणून यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ करत १३ हजार ४०० वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट्य देण्यात आले असून आठ तालुक्यांना १० हजार बंधारे बांधण्याचे, जिल्हा अधीक्षक कृषी विभागाला ३ हजार तर सामाजिक वनीकरण विभागाला ४०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. गतवर्षी ६७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते.बंधारे बांधण्यासाठी सुमारे ६ लाख रिकाम्या पिशव्यांची आवश्यकता लागणार असून ३ लाख पिशव्या या सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम या विभागांकडून प्राप्त होतील तर ३ लाख पिशव्यांसाठी जिल्हा परिषद फंडातून ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती संदेश सावंत यांनी दिली. कमी पडलेल्या पावसामुळे यावर्षी पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नद्यानाल्यांमधून समुद्राला मिळणारे पाणी त्याच ठिकाणी अडवून संभाव्य पाणीटंचाईवर मात करा व बंधारे बांधण्याच्या कामाला हयगय करू नका, असे आदेशही संदेश सावंत यांनी दिले. (प्रतिनिधी)जिल्हा नोव्हेंबरपर्यंत हागणदारीमुक्त : देवगड, कणकवली, मालवणची घोषणाजिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१४ गावे निर्मल हागणदारीमुक्त झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे. आॅक्टोबरच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील देवगड, मालवण व कणकवली या तीन तालुक्यांना हागणदारीमुक्त म्हणून जाहीर करण्यात आले तर कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले हे तीन तालुके या आठ ते पंधरा दिवसांत हागणदारीमुक्त म्हणून जाहीर होतील. वैभववाडी व दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येकी एक ते दोन ग्रामपंचायतींमध्ये हा प्रश्न जटील असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तेथे भेटी देऊन योग्य त्या उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा नोव्हेंबरअखेर हागणदारीमुक्त होईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर यांनी दिली.प्लास्टिकमुक्ती कणकवली पासूनजिल्ह्यात प्लास्टिकमुक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून यासाठीचा आराखडा बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्यांदा शहरांमधील बाजारपेठांमधून सुरुवात करण्यात येणार आहे. कणकवली तालुक्याची पहिल्यांदा निवड करण्यात आली असून कलमठ, खारेपाटण, फोंडा, सांगवे या मोठ्या ग्रामपंचायतींना भेटी देऊन प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे संदेश सावंत यांनी स्पष्ट केले.वैभववाडीत ३१ विहिरी दूषितआरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरीच्या १७३० पाणी नमुन्यांपैकी ८१ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित नमुने आढळल्याचे प्रमाण ४.६ टक्के एवढे आहे. वैभववाडी तालुक्यात तब्बल ३१ पाणी नमुने दूषित आढळले असून त्याची टक्केवारी ३० टक्के एवढी आहे.हे सर्व पाणी नमुने शुद्ध करून पिण्यायोग्य करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. व्ही. सोडल यांनी दिली. ड्युवेल पंप योजनेसाठी निधीच नाहीभूजल सर्वेक्षण विभागामार्फत सौर ड्युवेल पंप व विद्युत ड्युवेल पंप या योजना राबविल्या जातात. मात्र, यावर्षी शासनाने या दोन्ही योजनांसाठी निधीच मंजूर न केल्याने या योजना बारगळल्या आहेत. दुर्गम भागातील जनतेला फायद्याची ठरणारी सौर ड्युवेल व विद्युत ड्युवेल पंप योजना निधीअभावी बंद पडली आहे. छोट्या वस्त्यांवर जेथे लाईटची व्यवस्था नव्हती त्याठिकाणी सौर ड्युवेल पंप योजना राबविण्यात जात होती. ग्रामीण भागात याला जास्त मागणी होती. गेल्या काही वर्षातील निच्चांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापासूनच सध्या असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक बनले आहे. नाहीतर मोठी समस्या भेडसावणार आहे.