शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दोडामार्गातील युवकांनी जपली मैत्री

By admin | Updated: September 6, 2015 20:51 IST

दिल दोस्ती दुनियादारी..! : पिकुळेतील लक्ष्मण गवसला आधार

वैभव साळकर --दोडामार्ग --संकटकाळी मदत करतो तो खरा मित्र, आपली चूक लक्षात आणून देतो तो मित्र अशा मैत्रीच्या व्याख्या केल्या जातात वर्षभरापूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाने मैत्री कशी असावी, त्याचे उदाहरण सर्वांना दिले. असेच मैत्रीचे नाते जोपासले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. पिकुळे-मधलीवाडी येथील लक्ष्मण सोमा गवस यांचे सहा महिन्यात तीन बैल मृत झाले. त्यांच्यातील दोन तर अगदी पावसाच्या तोंडावर. मग शेती करायची कशी? असा प्रश्न गवस कुटुंबियांवर पडला. आपल्या मित्राला आधार दिला पाहिजे, यासाठी त्याच्या दोडामार्गातील मित्रांनी ३० हजार रूपयांची मदत केली आणि मित्रत्वाचे नाते दृढ केले.गवस हे कुटुंबप्रमुख. त्यांच्या कुटुंबात आईसह पत्नी व तीन मुलगे राहतात. एक मुलगा महाविद्यालय, तर दोन विद्यालयीन शिक्षण घेतात. गवस यांचा चरितार्थ केवळ शेती व्यवसायावर चालतो. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षाची आर्थिक समीकरणे ठरतात. खासकरून पावसाळी शेतीतील भात हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. आपल्या कुटुंबाच्या कष्टाच्या जीवावर गवस हे शेती करतात. यासाठी त्यांचे तीन बैल होते. आहे त्याच्यात समाधान मानणारे हे कुटुंब आपल्या गरजा भागवित सुखी होते. पण अचानक दृष्ट लागावी तशी एकेक प्रकरणे धक्काच देणारी ठरली. सुरूवातीला एक बैल अचानक मृत पावला. काहीतरी इजा झाली असेल, उर्वरीत दोन बैलांनी शेती करूया, असे त्यांनी ठरविले आणि आठवडाभरापूर्वी उर्वरीत दोन बैलही दगावले. या प्रकाराने गवस कुटुंबाला अक्षरक्ष: धक्का बसला. आता करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला.तीनही बैैलांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत नुकसान भरपाई काहीही मिळाली नाही. कुटुंबप्रमुख गवस या प्रकाराने खचले. त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे वाढवलेले बैल दगावले. हे घरातील कुटुंबाच्या सदस्यांच्या बाबतीत झाल्यासारखे होते. सारे कुटुंब दु:खात बुडाले. ही बातमी त्यांच्या दोडामार्गातील मित्रांना समजली. मित्रासाठी काहीतरी केले पाहिजे, त्याला सावरले पाहिजे, या विचाराने प्रशांत नाईक, (उगाडे), गिरीष कळणेकर (कळणे), अ‍ॅड. दाजी नाईक (उसप), अजित गवस (उगाडे), अशोक लोंढे (कोनाळकट्टा), किरण तळावडेकर (मणेरी), गुंडु केसरकर (घोटगे), सुधीर नाईक (मणेरी), संजय केसरकर (कोनाळकट्टा), संदीप गवस (दोडामार्ग), संतोष देसाई (कुडासे) यांनी एकत्र येत ३० हजार रूपये जमा करीत गवस यांच्याकडे सुपूर्द केले.याला म्हणतात मैत्री!दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा होतो. यावेळी कोण मित्राला गुलाब देतो, तर कोणी मॅसेज पाठवितो. मोबाईलचे इनबॉक्स तर फुल्ल झालेले असतात. सोशल मीडियात तर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. परंतु संकटात सापडलेल्या मित्राला मदत करण्याच्या घटना, मैत्रीचा आधार देवून उभारी देण्याच्या घटना क्वचितच घडतात आणि त्याची दखलही अपवादानेच घेतली जाते. मात्र, मैत्रीच्या नात्याचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचे काम केले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. त्यांनी आपल्या मित्राला केलेली मदत ही बराच बोध देणारी आहे. अशा मित्रांना मनापासूून 'सॅल्युट'!