शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

दोडामार्गातील युवकांनी जपली मैत्री

By admin | Updated: September 6, 2015 20:51 IST

दिल दोस्ती दुनियादारी..! : पिकुळेतील लक्ष्मण गवसला आधार

वैभव साळकर --दोडामार्ग --संकटकाळी मदत करतो तो खरा मित्र, आपली चूक लक्षात आणून देतो तो मित्र अशा मैत्रीच्या व्याख्या केल्या जातात वर्षभरापूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाने मैत्री कशी असावी, त्याचे उदाहरण सर्वांना दिले. असेच मैत्रीचे नाते जोपासले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. पिकुळे-मधलीवाडी येथील लक्ष्मण सोमा गवस यांचे सहा महिन्यात तीन बैल मृत झाले. त्यांच्यातील दोन तर अगदी पावसाच्या तोंडावर. मग शेती करायची कशी? असा प्रश्न गवस कुटुंबियांवर पडला. आपल्या मित्राला आधार दिला पाहिजे, यासाठी त्याच्या दोडामार्गातील मित्रांनी ३० हजार रूपयांची मदत केली आणि मित्रत्वाचे नाते दृढ केले.गवस हे कुटुंबप्रमुख. त्यांच्या कुटुंबात आईसह पत्नी व तीन मुलगे राहतात. एक मुलगा महाविद्यालय, तर दोन विद्यालयीन शिक्षण घेतात. गवस यांचा चरितार्थ केवळ शेती व्यवसायावर चालतो. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षाची आर्थिक समीकरणे ठरतात. खासकरून पावसाळी शेतीतील भात हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. आपल्या कुटुंबाच्या कष्टाच्या जीवावर गवस हे शेती करतात. यासाठी त्यांचे तीन बैल होते. आहे त्याच्यात समाधान मानणारे हे कुटुंब आपल्या गरजा भागवित सुखी होते. पण अचानक दृष्ट लागावी तशी एकेक प्रकरणे धक्काच देणारी ठरली. सुरूवातीला एक बैल अचानक मृत पावला. काहीतरी इजा झाली असेल, उर्वरीत दोन बैलांनी शेती करूया, असे त्यांनी ठरविले आणि आठवडाभरापूर्वी उर्वरीत दोन बैलही दगावले. या प्रकाराने गवस कुटुंबाला अक्षरक्ष: धक्का बसला. आता करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला.तीनही बैैलांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत नुकसान भरपाई काहीही मिळाली नाही. कुटुंबप्रमुख गवस या प्रकाराने खचले. त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे वाढवलेले बैल दगावले. हे घरातील कुटुंबाच्या सदस्यांच्या बाबतीत झाल्यासारखे होते. सारे कुटुंब दु:खात बुडाले. ही बातमी त्यांच्या दोडामार्गातील मित्रांना समजली. मित्रासाठी काहीतरी केले पाहिजे, त्याला सावरले पाहिजे, या विचाराने प्रशांत नाईक, (उगाडे), गिरीष कळणेकर (कळणे), अ‍ॅड. दाजी नाईक (उसप), अजित गवस (उगाडे), अशोक लोंढे (कोनाळकट्टा), किरण तळावडेकर (मणेरी), गुंडु केसरकर (घोटगे), सुधीर नाईक (मणेरी), संजय केसरकर (कोनाळकट्टा), संदीप गवस (दोडामार्ग), संतोष देसाई (कुडासे) यांनी एकत्र येत ३० हजार रूपये जमा करीत गवस यांच्याकडे सुपूर्द केले.याला म्हणतात मैत्री!दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा होतो. यावेळी कोण मित्राला गुलाब देतो, तर कोणी मॅसेज पाठवितो. मोबाईलचे इनबॉक्स तर फुल्ल झालेले असतात. सोशल मीडियात तर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. परंतु संकटात सापडलेल्या मित्राला मदत करण्याच्या घटना, मैत्रीचा आधार देवून उभारी देण्याच्या घटना क्वचितच घडतात आणि त्याची दखलही अपवादानेच घेतली जाते. मात्र, मैत्रीच्या नात्याचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचे काम केले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. त्यांनी आपल्या मित्राला केलेली मदत ही बराच बोध देणारी आहे. अशा मित्रांना मनापासूून 'सॅल्युट'!