शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

आराखडा कागदावर राहू नये

By admin | Updated: October 30, 2015 23:10 IST

वैभव नाईक यांच्या सूचना : मालवण तालुका पाणीटंचाई आढावा बैठक

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाची सरासरी ४० टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा पोहचण्यापूर्वी तयार केलेला पाणी टंचाईचा आराखडा कागदावर राहू नये. पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पक्षीय राजकारण करता आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. विंधन विहिरींच्या गाळ उपसासाठी असणारी अत्याधुनिक मशीन यंत्रणाही जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले.मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणाबाबत गुरुवारी तालुका स्कूल येथे आढावा सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर, संजीवनी लुडबे, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, राजेंद्र्र प्रभुदेसाई, हिमाली अमरे, ग्रामविस्तार अधिकारी पी. डी. जाधव, पाणीपुरवठा विभागाचे वैभव वाळके तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गरम पाणीपुरवठा समिती अध्यक्ष उपस्थित होते. आजच्या सभेस यांत्रिकी विभागाचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गतवर्षी ७० विंधन विहिरी घेण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ दोनच कामांना मंजुरी मिळत असेल तर कागदपत्रे गोळा करून उपयोगच काय? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. तालुक्यात पाणी टंचाईसाठी अत्यावश्यक ठिकाणी आमदार निधी उपलब्ध करून देवू असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)आवश्यक असल्यास फौजदारी करा : पराडकरसभापती परुळेकर यांनी काही गावात विहिरींची कामे अपूर्ण राहिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी या कामांना मंजुरी, देखरेख, निधी हे सारे अधिकार ग्रामसभेला असतात. आवश्यकता असल्यास फौजदारी दाखल करावी असेही सुचित केले. काही ठिकाणी विंधन विहीर अथवा नळपाणी योजनेसाठी बसवण्यात येणाऱ्या पंपासाठी आवश्यक ती कागदपत्रे देऊन मीटर बसविण्याच्या सूचना पराडकर यांनी केल्या. वैभव नाईक : पाणी टंचाईवर मात करूयावैभव नाईक म्हणाले, शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांपासून सरपंचानी सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा. जलयुक्त शिवार योजनेतून मालवण तालुक्याला साडे चार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. आगामी काळात योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी सहभागी होऊन पाणी टंचाईवर मात करावी, असे आवाहन केले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यात जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेत आपले गाव कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीने बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करताना आजपासून जाहीर करण्यात आलेला बंधारा पंधरवडा या कार्यक्रमा अंतर्गत असलेले पाणी साचवून तालुक्याचे १६०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पाणी टंचाईवर मात करूया, असे आवाहनही नाईक यांनी केले.