शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा कागदावर राहू नये

By admin | Updated: October 30, 2015 23:10 IST

वैभव नाईक यांच्या सूचना : मालवण तालुका पाणीटंचाई आढावा बैठक

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाची सरासरी ४० टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा पोहचण्यापूर्वी तयार केलेला पाणी टंचाईचा आराखडा कागदावर राहू नये. पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पक्षीय राजकारण करता आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. विंधन विहिरींच्या गाळ उपसासाठी असणारी अत्याधुनिक मशीन यंत्रणाही जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले.मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणाबाबत गुरुवारी तालुका स्कूल येथे आढावा सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर, संजीवनी लुडबे, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, राजेंद्र्र प्रभुदेसाई, हिमाली अमरे, ग्रामविस्तार अधिकारी पी. डी. जाधव, पाणीपुरवठा विभागाचे वैभव वाळके तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गरम पाणीपुरवठा समिती अध्यक्ष उपस्थित होते. आजच्या सभेस यांत्रिकी विभागाचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गतवर्षी ७० विंधन विहिरी घेण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ दोनच कामांना मंजुरी मिळत असेल तर कागदपत्रे गोळा करून उपयोगच काय? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. तालुक्यात पाणी टंचाईसाठी अत्यावश्यक ठिकाणी आमदार निधी उपलब्ध करून देवू असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)आवश्यक असल्यास फौजदारी करा : पराडकरसभापती परुळेकर यांनी काही गावात विहिरींची कामे अपूर्ण राहिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी या कामांना मंजुरी, देखरेख, निधी हे सारे अधिकार ग्रामसभेला असतात. आवश्यकता असल्यास फौजदारी दाखल करावी असेही सुचित केले. काही ठिकाणी विंधन विहीर अथवा नळपाणी योजनेसाठी बसवण्यात येणाऱ्या पंपासाठी आवश्यक ती कागदपत्रे देऊन मीटर बसविण्याच्या सूचना पराडकर यांनी केल्या. वैभव नाईक : पाणी टंचाईवर मात करूयावैभव नाईक म्हणाले, शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांपासून सरपंचानी सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा. जलयुक्त शिवार योजनेतून मालवण तालुक्याला साडे चार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. आगामी काळात योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी सहभागी होऊन पाणी टंचाईवर मात करावी, असे आवाहन केले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यात जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेत आपले गाव कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीने बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करताना आजपासून जाहीर करण्यात आलेला बंधारा पंधरवडा या कार्यक्रमा अंतर्गत असलेले पाणी साचवून तालुक्याचे १६०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पाणी टंचाईवर मात करूया, असे आवाहनही नाईक यांनी केले.