शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

विनाशकारी प्रकल्पांना थारा देऊ नये

By admin | Updated: February 19, 2015 23:50 IST

आंबोलीत जनसुनावणी : इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत एकमुखी ठराव

आंबोली : आंबोलीच्या निसर्र्गसौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना आंबोलीत थारा देऊ नये, असा एकमुखी ठराव आंबोली येथील ग्रामपंचायतीत झालेल्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत घेण्यात आला. आंबोली गावात इको-सेन्सिटिव्ह झोन हवा का नको, याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. यावेळी सरपंच गजानन पालेकर, शशिकांत गावडे, दिनकर भिसे, तांत्रिक अधिकारी संजय सावंत, गौरव दळवी, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. अळवणी व ग्रामस्थ उपस्थित होते. आंबोलीला पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगात जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींमध्ये आंबोलीच्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीबाबतच्या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. परंतु, ग्रामस्थांनी या सुनावणीकडे पाठ फिरविली. केवळ आठ ते दहा ग्रामस्थ या सुनावणीला उपस्थित होते. सरपंच पालेकर यांनी इको-सेन्सिटिव्हबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना आपण आपल्या विभागाशी संबंधित कोणती माहिती देणार आहात का, असे विचारले असता, संबंधितांनी वन, कृषी, महाराष्ट्र शासन यांच्या नावे असलेल्या जमिनींचे हेक्टरी क्षेत्र सांगितले. यानंतर ग्रामस्थ रामचंद्र गावडे यांनी आंबोलीत कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न न्यायालयात प्रविष्ट असताना इको-सेन्सिटिव्ह कोणत्या जमिनीला लावणार? असा प्रश्न करून, गेली २० वर्षे आम्ही आमच्या जमिनी मिळविण्यासाठी लढा देत असताना आपल्याकडून अशा जनसुनावण्या घेणे योग्य आहे का, असा सवाल केला. (वार्ताहर)आंबोलीत १९६५ पूर्वीपासूनच्या घरांवर व जमिनींवर वन लागलेले आहे. त्यामुळे जरी राखीव वने इको-सेन्सिटिव्हमध्ये घ्यायची म्हटली, तरी ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या नावावर होत नाहीत, तोपर्यंत इको-सेन्सिटिव्हला आमचा विरोध राहील, असे ग्रामस्थांनी सांगितले.