शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

विनाशकारी प्रकल्पांना थारा देऊ नये

By admin | Updated: February 19, 2015 23:50 IST

आंबोलीत जनसुनावणी : इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत एकमुखी ठराव

आंबोली : आंबोलीच्या निसर्र्गसौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना आंबोलीत थारा देऊ नये, असा एकमुखी ठराव आंबोली येथील ग्रामपंचायतीत झालेल्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत घेण्यात आला. आंबोली गावात इको-सेन्सिटिव्ह झोन हवा का नको, याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. यावेळी सरपंच गजानन पालेकर, शशिकांत गावडे, दिनकर भिसे, तांत्रिक अधिकारी संजय सावंत, गौरव दळवी, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. अळवणी व ग्रामस्थ उपस्थित होते. आंबोलीला पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगात जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींमध्ये आंबोलीच्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीबाबतच्या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. परंतु, ग्रामस्थांनी या सुनावणीकडे पाठ फिरविली. केवळ आठ ते दहा ग्रामस्थ या सुनावणीला उपस्थित होते. सरपंच पालेकर यांनी इको-सेन्सिटिव्हबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना आपण आपल्या विभागाशी संबंधित कोणती माहिती देणार आहात का, असे विचारले असता, संबंधितांनी वन, कृषी, महाराष्ट्र शासन यांच्या नावे असलेल्या जमिनींचे हेक्टरी क्षेत्र सांगितले. यानंतर ग्रामस्थ रामचंद्र गावडे यांनी आंबोलीत कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न न्यायालयात प्रविष्ट असताना इको-सेन्सिटिव्ह कोणत्या जमिनीला लावणार? असा प्रश्न करून, गेली २० वर्षे आम्ही आमच्या जमिनी मिळविण्यासाठी लढा देत असताना आपल्याकडून अशा जनसुनावण्या घेणे योग्य आहे का, असा सवाल केला. (वार्ताहर)आंबोलीत १९६५ पूर्वीपासूनच्या घरांवर व जमिनींवर वन लागलेले आहे. त्यामुळे जरी राखीव वने इको-सेन्सिटिव्हमध्ये घ्यायची म्हटली, तरी ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या नावावर होत नाहीत, तोपर्यंत इको-सेन्सिटिव्हला आमचा विरोध राहील, असे ग्रामस्थांनी सांगितले.