शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

विनाशकारी प्रकल्पांना थारा देऊ नये

By admin | Updated: February 19, 2015 23:50 IST

आंबोलीत जनसुनावणी : इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत एकमुखी ठराव

आंबोली : आंबोलीच्या निसर्र्गसौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना आंबोलीत थारा देऊ नये, असा एकमुखी ठराव आंबोली येथील ग्रामपंचायतीत झालेल्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत घेण्यात आला. आंबोली गावात इको-सेन्सिटिव्ह झोन हवा का नको, याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. यावेळी सरपंच गजानन पालेकर, शशिकांत गावडे, दिनकर भिसे, तांत्रिक अधिकारी संजय सावंत, गौरव दळवी, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. अळवणी व ग्रामस्थ उपस्थित होते. आंबोलीला पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगात जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींमध्ये आंबोलीच्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीबाबतच्या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. परंतु, ग्रामस्थांनी या सुनावणीकडे पाठ फिरविली. केवळ आठ ते दहा ग्रामस्थ या सुनावणीला उपस्थित होते. सरपंच पालेकर यांनी इको-सेन्सिटिव्हबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना आपण आपल्या विभागाशी संबंधित कोणती माहिती देणार आहात का, असे विचारले असता, संबंधितांनी वन, कृषी, महाराष्ट्र शासन यांच्या नावे असलेल्या जमिनींचे हेक्टरी क्षेत्र सांगितले. यानंतर ग्रामस्थ रामचंद्र गावडे यांनी आंबोलीत कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न न्यायालयात प्रविष्ट असताना इको-सेन्सिटिव्ह कोणत्या जमिनीला लावणार? असा प्रश्न करून, गेली २० वर्षे आम्ही आमच्या जमिनी मिळविण्यासाठी लढा देत असताना आपल्याकडून अशा जनसुनावण्या घेणे योग्य आहे का, असा सवाल केला. (वार्ताहर)आंबोलीत १९६५ पूर्वीपासूनच्या घरांवर व जमिनींवर वन लागलेले आहे. त्यामुळे जरी राखीव वने इको-सेन्सिटिव्हमध्ये घ्यायची म्हटली, तरी ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या नावावर होत नाहीत, तोपर्यंत इको-सेन्सिटिव्हला आमचा विरोध राहील, असे ग्रामस्थांनी सांगितले.