शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

बाहेरच्यांनी तोंड खुपसू नये : जाधव

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

सन २००२च्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा पराभव झाला. तेव्हापासून मारहाणीच्या घटना घडतच आहेत.

चिपळूण : गेली ३२ वर्षे मी राजकारणात टिकून आहे. प्रतिवाद कधी केला नाही. दोन दिवसांपूर्वी माझ्या तुरंबव गावात एका कार्यक्रमात माझे मुलगे, पुतण्या व भाऊ हे बेसावध असताना त्यांच्यावर बाळकृष्ण जाधव व समर्थकांकडून हल्ला झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. हा आमच्या भावकीतील वाद असून, एकतर्फी बाजू जनतेसमोर येत आहे. या भांडणात बाहेरच्यांनी तोंड खुपसू नये, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांचे नाव न घेता आमदार भास्कर जाधव यांनी आज (रविवारी) येथे दिला. आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुरंबव - पालेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य सत्कार कार्यक्रमात झालेल्या दोन गटातील मारहाणीबाबत ते बोलत होते. व्यासपीठावरील एकही व्यक्ती गंभीर जखमी झालेली नाही. भाऊ सुनील जाधव, मुलगा समीर, विक्रांत तसेच पुतण्या हे बेसावध असताना त्यांना मारहाण झाली. सोडवायला गेलेल्या लोकांनाच मारहाण झाली. त्यामुळे बाळकृष्ण जाधव यांच्याकडूनच नियोजित हा मारहाणीचा कट होता, असा आरोप जाधव यांनी केला. काळोखातून दगडफेक केली गेली. काहींची खोटी नावे टाकली गेली आहेत. या मारहाणीमागे अन्य कंगोरे आहेत, असे जाधव म्हणाले. सन २००२च्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा पराभव झाला. तेव्हापासून मारहाणीच्या घटना घडतच आहेत. यामागे खरे सूत्रधार कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. हा विषय घरचा आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. जास्त मार हा आमच्या लोकांना लागला आहे. कारण ते बेसावध होते. पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने संघटना व बाहेरच्या लोकांकडून दबाव आणला जातोय. त्यामुळे दबाव कसा असतो, ते मी पोलिसांना दाखवून देईन. घरचे भांडण बाहेर जाऊ नये, म्हणून गप्प बसलो होतो. बाळकृष्ण जाधव हे साळसुदपणाचा आव आणत आहेत. सत्याची कास कधी सोडली नाही. बौध्द समाजबांधवांसाठी १५ लाखांचे समाजमंदिर आपण उभे केले आहे. बाळकृष्ण जाधव यांनीच जातीवादाचा लढा उभा केला आहे. अजित पालशेतकर हा देवळात जातो म्हणून त्याचा राग आहे. पोलीसही या प्रकरणात पक्षपातीपणा करीत आहेत. पोलिसांनी निपक्षपातीपणा या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी आपण करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)