शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

विकासात राजकारण आणू नका : राणे

By admin | Updated: July 28, 2015 00:28 IST

ग्रामसभेला महत्व असून याठिकाणी झालेला ठराव हे महत्त्वाचे ठराव असतात.

देवगड : ग्रामपंचायत हे विकासाचा केंद्र असून, गावामध्ये खऱ्या अर्थाने या माध्यमातून विकास होऊ शकतो. यामुळे गावचे सरपंच हे नि:पक्षपाती असणे गरजेचे आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच विकासात कोणतेही राजकारण न आणता विकासाच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवा. मी त्या आमदार या नात्याने नक्कीच मार्गी लावीन असेही ते म्हणाले.नाडण ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्या निकिता तानवडे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, देवगड पंचायत समिती उपसभापती स्मिता राणे, माजी सभापती राजाराम राणे, नाडण सरपंच रामकृष्ण उपरकर, उपसरपंच मकरंद जोशी, सुधीर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार राणे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावामध्ये विकासाची कामे ही होतच असतात. मात्र, ग्रामसभेला महत्व असून याठिकाणी झालेला ठराव हे महत्त्वाचे ठराव असतात. यामुळे गावच्या ग्रामसभेलाही ग्रामस्थांनी उपस्थित राहाणे महत्त्वाचे असते. देवगड तालुका हा डोंगर दरीमध्ये वसलेला असून, विकासकामे नियोजनबद्ध करावी लागतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)