शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

समुद्रातूून येणाऱ्या आवाजाने घाबरून जाऊ नये : केसरकर

By admin | Updated: April 27, 2016 23:20 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी मंत्रालयातून केले आहे.

सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुुदुर्ग येथील समुद्रातून स्फोटाचे आवाज येत आहेत. हा भूकंप वा त्सुनामी नसून, असे आवाज येण्यामागील कारणांचा तज्ज्ञांच्या माध्यमातून शोध घेण्यात येईल. आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये व याबाबत कुठलीही अफवा पसरवू नये, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी मंत्रालयातून केले आहे.  समुद्रातून येणाऱ्या गूढ आवाजाबाबत केसरकर यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र कोस्टल गार्डचे (आॅपरेशन अँड प्लॅनिंग) अनिल शर्मा, मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त डॉ. सुनील देशपांडे, सिंधुदुर्ग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू-वैज्ञानिक रश्मी कदम, आदी यावेळी उपस्थित होते. केसरकर पुढे म्हणाले, भूूकंप होणार, त्सुनामी येणार ही केवळ अफवा आहे. याबाबत भूरचना शास्त्र विभागाचे संचालक यांचा ‘इन्क्वॉयस हैदराबाद’ या संस्थेच्या वरिष्ठांशी संवाद झाला आहे. कोकणात लॅटराईट खडक असल्यामुळे भूकंप होण्याची शक्यता नाही, असे इन्क्वॉयसचे म्हणणे आहे. डायनामाईट फिशिंगमुळे असे आवाज येत असतील तर त्याला प्रतिबंध करण्याच्या सूचना कोस्टल विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. स्थानिक मासेमाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मान्सून दाखल होत असताना मान्सूनचे संकेत म्हणून असे आवाज येत असतात. याबाबतही भारतीय हवामान खात्याने ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, भूकंपाचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणांनी काळजी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)ब्लू टीम पडणार रेड टीमवर भारीसागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी स्थानिक पोलिसांची ब्ल्यू टीम सुरक्षा कवच मोहिमेत कार्यरत असते, तर राज्यातील अन्य भागातून रेड टीमला सुरक्षा कवच भेदण्यासाठी पाठविण्यात येते. आतापर्यंत मात्र ब्ल्यू टीमचे रेड टीम सुरक्षा कवच भेदू शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या ब्ल्यू टीमच्यावतीने सागरी मार्ग तसेच मुख्य रस्ता मार्गावरही वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. रेड टीमला पकडण्यास ब्लू टीम यशस्वी ठरली, तर ब्ल्यू टीम अभिनंदनास पात्र ठरते. मात्र, रेड टीम ब्ल्यू टीमची सुरक्षा भेदण्यात यशस्वी ठरली, तर ब्ल्यू टीमला कारवाईस तयार राहावे लागते. त्यामुळे रेड टीमचे आव्हान भेदण्यासाठी पोलिसांची ब्ल्यू टीम सतर्क बनली आहे.