शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे ‘दिवाळे’

By admin | Updated: November 11, 2015 23:39 IST

अवकाळीने हिसकावला तोंडचा घास : शेतकरी हवालदील, सरकारने तातडीने मदत करण्याची गरज--लोकमत विशेष

रजनीकांत कदम -- कुडाळ  जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने काढून घेतल्याने या शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीतच दिवाळे निघाले आहे. तरी महामागाईच्या भस्मासूरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेले भात पाऊस पडल्याने रानातच आडवे झाले. तर काही ठिाकाणी कापलेले भातपिक भिजून खराब झाले आहे. सलग तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीमध्ये पाणी साचले. पिकलेले आणि कापायला आलेले भाताचे पीक अगोदरच लोंबकळत होते. पण या पावसामुळे व पावसासोबतच्या वाऱ्यामुळे शेतात पडून पावसाच्या पाण्यात डुंबले आहे. त्यामुळे ते भात सर्रास खराब झाले. काही ठिकाणी भिजलेले हे भात काळे पडले आहे तर काही ठिकाणी भातशेतीच कुजून गेले आहे. शेतीतून काहीच उत्पन्न आले नसल्याची स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. या परिस्थितीने येथील शेतकरी उदासिन झाला आहे.शेतकरी त्रस्त : विस्कळीत वातावरण, निसर्गचक्र बदलल्याचा फटकानिसर्गचक्र बदलल्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत असून, देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार नेहमीच उदासिनता दाखवित आहे. त्यामुळे नुकसान किती झाले, हे सांगून उपयोग काय? नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे किती नुकसान झाले हे सांगण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. तर ते असलेली थोडीफार शेती वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. जूननंतर जुलै महिन्यात गायब झालेला पाऊस व त्यामुळे लांबणीवर पडलेली भातशेतीची लागवड व नंतर पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे जिल्ह्यात यावर्षी भातशेतीची लागवडही काही प्रमाणात घटली. पण ज्यांनी ही लागवड केली त्यांना हंगामाच्या सरतेशेवटी आलेल्या पिकाची आशा लागून होती. भातकापणी झोडणीचा हंगामही जोमात सुरू झाला होता. दरम्यानच परतीच्या अवकाळी पावसाने भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी केल्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडून गेले. महागाईला तोंड देताना सामान्य लोक हैराण झाले असताना अशा काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची काय अवस्था होईल, याचा विचार करून येथील भातशेती करणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नोंदणी करणे सर्र्वाच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे बनले आहे.